शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

वाहतुकीच्या अहवालात त्रुटी

By admin | Updated: July 8, 2017 05:28 IST

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एका सल्लागार कंपनीने तयार केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एका सल्लागार कंपनीने तयार केलेल्या अहवालात असंख्य त्रुटी असल्याकडे शुक्रवारच्या केडीएमसीच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लक्ष वेधले. ढोबळ मानाने तयार केलेल्या अहवालासाठी संबंधित कंपनीला ३३ लाख ३६ हजार रुपये अदा केले जाणार आहेत, यावरही नगरसेवकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले. अखेर या अहवालातील केवळ हॉकर्स आणि पार्किंग पॉलिसीचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असा आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला दिला.वाहतुकीच्या समस्या व उपाययोजना सूचवण्यासाठी मे. आकार अभिनव कन्सलटन्ट या कंपनीला अहवाल तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यांनी सूचवलेल्या अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन उपाययोजनांसाठी ११ हजार १२६ कोटी ७२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील २० वर्षांसाठी या खर्चाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने या प्रकल्प अहवालास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव महासभेच्या पटलावर प्रशासनाने दाखल केला होता. हा प्रस्ताव चर्चेला येताच शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी या अहवालावर टीका केली. ९ हजार हेक्टर जमीन शहरी विकासासाठी ठेवली होती, यातील ७० टक्के जागेवर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, मग उपाययोजना व विकासासाठी जागा शिल्लक आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी केवळ स्थायी समितीची मंजुरी घेतली , या धोरणात्मक निर्णयासाठी महासभेची मान्यता घ्यायला हवी होती, याकडे भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांनी लक्ष वेधले. एकीकडे २ ते ४ लाखांच्या विकासकामांच्या फाइली मंजूर करताना प्रशासनाच्या दारी खेपा घालाव्या लागतात, मात्र अशा सल्लागार कंपनीवर तत्काळ ३३ लाखांचा खर्च केला जातो. बीएसयुपी योजनेच्या सल्लागारासाठी १६ कोटी फी मोजली, परंतु त्याचे फलित काय मिळाले?, असा सवाल भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांनी केला. या अहवालात असंख्य त्रुटी असून ढोबळ अंदाज दिले आहेत, याला विरोध असल्याचे मत शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी मांडले. दरम्यान, मनसेचे विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी सध्या हॉकर्स आणि पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. संबंधित अहवालात त्याचाही उल्लेख आहे, त्यामुळे या बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना मांडली. ही सूचना महापौर राजेंद्र देवळेकर व सर्वपक्षांच्या सदस्यांनी एकमताने मान्य केली.सामंत-शेट्टी यांच्यात खडाजंगी कल्याण पूर्वेकडील लोकग्राम बुकींग कार्यालय ते नेतीवली रस्त्यापर्यंत विकास आराखड्याप्रमाणे रस्ता तयार करण्याच्या कामात स्थळ बदली करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दाखल केला होता. मात्र, या रस्त्याचे काम पाच वर्षांपूर्वी झाले असताना इतक्या उशिरा प्रस्ताव महासभेत का आला?, असा सवाल विरोधीपक्षनेते हळबे यांनी प्रशासनाला केला. त्यावर भाजपाचे राजन सामंत यांनीही प्रस्ताव चुकीच्या पध्दतीने आल्याचे सांगत त्यास मंजुरी देण्यास नकार दिला. त्यावर शिवसेनेचे लोकग्राममधील स्थानिक नगरसेवक मल्लेश शेट्टी हे कमालीचे संतप्त झाले. नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता तयार केला आहे. रेल्वे प्रशासनाने समांतर रस्त्यास मान्यता नाकारल्याने गृहसंकुलातून नागरिकांसाठी वहीवाट तयार केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. प्रस्ताव मंजूर करण्यास हरकत काय?, असा सवाल करत नाहीतर रस्ता बंद करतो, अशी भाषा शेट्टी यांनी वापरली. त्याला सामंत यांनी हरकत घेत धमकीची भाषा बोलू नका, असे त्यांना सुनावले. यावर धमकीच देतोय असे समज, असे बोल शेट्टी यांनी सुनावले. त्यामुळे त्यांच्यात आणि सामंत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वेळी महापौर देवळेकर आणि सभागृहनेते राजेश मोरे यांनी मध्यस्ती करत दोघांनाही शांत केले. प्रशासनाच्या चुकीमुळे नगरसेवकांमध्ये भांडण होत असल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले. यावेळी झालेल्या बहुचर्चेनंतर संबंधित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.