शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 06:04 IST

शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

अलिबाग/ठाणे : शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे ऐन पावसात रहिवासी घर सोडून रस्त्यावर आले. या भूकंपाचा केंद्र बिंदू रायगड जिल्ह्यात असून तो २.८ रिश्टर स्केल इतका नोंदवला गेला आहे.पाऊस सुरू असतानाच भूगर्भात आवाज होऊन काही नागरिकांना हादरे बसले. रात्री उशिरापर्यंत या भूकंपाचा केंद्रबिंदू शोधणे शक्य झाले नाही. मात्र, या भूकंपाची खात्री करून घेण्यासाठी दिल्लीच्या भूकंपदर्शक विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी दुजोरा दिला. २.८ रिश्टर स्केल असलेला भूकंप महाराष्टÑातील रायगड जिल्ह्यात झाल्याचे दिल्ली येथील भूकंपदर्शक विभागातील एस.आर. पॉल यांनी लोकमतला सांगितले. रायगडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील कोणलाच त्याची अधिकृत माहिती मिळत नव्हती. यामुळे शुक्रवारी उशिरापर्यंत भूकंपाविषयी तर्कवितर्क सुरू होते.तर, रायगड जिल्ह्याला शुक्र वारी रात्री ९.३०च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे जिल्ह्यात जीवित वा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, भूकंप हादऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरडप्रवण गावात अधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री रायगड, ठाणे व डोंबिवली, कल्याण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याचे केंद्र १९.१ उत्तर अक्षांश, ७३.२ पूर्व रेखांश, पाच कि.मी. खोलवर होते. हे धक्के २.८ रिक्टर स्केल तीव्रतेचे होते.रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाºयांकडून आढावा घेतला. जिल्ह्यातील दरडप्रवण गावांमध्ये अधिकाºयांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण आहेत. धोक्याच्या पातळीनुसार जिल्ह्यातील नऊ गावे ही वर्ग-१ (अतिधोकेदायक), ११ गावे वर्ग-२ मध्ये तर उर्वरित ८३ गावे ही वर्ग-३ श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.>तालुकानिहाय दरडप्रवण गावेमहाड -४९, पोलादपूर -१५, रोहा -१३, म्हसळा-६, माणगाव - ५, तर सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी ३, श्रीवर्धन २ आणि तळा तालुक्यात १ अशी एकूण १०३ गावे दरडप्रवण आहेत.मे महिन्यातच प्रशासनाने या गावांतील ५१५ गावकºयांना प्रशिक्षित केले आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकाºयांनी आपापल्या क्षेत्रातील दरडप्रवण गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.