शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 06:04 IST

शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

अलिबाग/ठाणे : शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे ऐन पावसात रहिवासी घर सोडून रस्त्यावर आले. या भूकंपाचा केंद्र बिंदू रायगड जिल्ह्यात असून तो २.८ रिश्टर स्केल इतका नोंदवला गेला आहे.पाऊस सुरू असतानाच भूगर्भात आवाज होऊन काही नागरिकांना हादरे बसले. रात्री उशिरापर्यंत या भूकंपाचा केंद्रबिंदू शोधणे शक्य झाले नाही. मात्र, या भूकंपाची खात्री करून घेण्यासाठी दिल्लीच्या भूकंपदर्शक विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी दुजोरा दिला. २.८ रिश्टर स्केल असलेला भूकंप महाराष्टÑातील रायगड जिल्ह्यात झाल्याचे दिल्ली येथील भूकंपदर्शक विभागातील एस.आर. पॉल यांनी लोकमतला सांगितले. रायगडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील कोणलाच त्याची अधिकृत माहिती मिळत नव्हती. यामुळे शुक्रवारी उशिरापर्यंत भूकंपाविषयी तर्कवितर्क सुरू होते.तर, रायगड जिल्ह्याला शुक्र वारी रात्री ९.३०च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे जिल्ह्यात जीवित वा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, भूकंप हादऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरडप्रवण गावात अधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री रायगड, ठाणे व डोंबिवली, कल्याण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याचे केंद्र १९.१ उत्तर अक्षांश, ७३.२ पूर्व रेखांश, पाच कि.मी. खोलवर होते. हे धक्के २.८ रिक्टर स्केल तीव्रतेचे होते.रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाºयांकडून आढावा घेतला. जिल्ह्यातील दरडप्रवण गावांमध्ये अधिकाºयांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण आहेत. धोक्याच्या पातळीनुसार जिल्ह्यातील नऊ गावे ही वर्ग-१ (अतिधोकेदायक), ११ गावे वर्ग-२ मध्ये तर उर्वरित ८३ गावे ही वर्ग-३ श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.>तालुकानिहाय दरडप्रवण गावेमहाड -४९, पोलादपूर -१५, रोहा -१३, म्हसळा-६, माणगाव - ५, तर सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी ३, श्रीवर्धन २ आणि तळा तालुक्यात १ अशी एकूण १०३ गावे दरडप्रवण आहेत.मे महिन्यातच प्रशासनाने या गावांतील ५१५ गावकºयांना प्रशिक्षित केले आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकाºयांनी आपापल्या क्षेत्रातील दरडप्रवण गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.