शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘आनंद’ तिकडे गेल्यानेच ‘श्रीकांत’ची राजकारणात एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 05:00 IST

ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असून आजपर्यंत आपण अनेक कठीण निवडणुका जिंकलो आहोत, असे म्हणत शिंदे यांनी आजवर जिंकलेल्या उमेदवारांची नावे सांगायला सुरुवात केली.

डोंबिवली : माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची राजकारणात एण्ट्री झाल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा महायुतीच्या मेळाव्यात रविवारीकेले.

ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असून आजपर्यंत आपण अनेक कठीण निवडणुका जिंकलो आहोत, असे म्हणत शिंदे यांनी आजवर जिंकलेल्या उमेदवारांची नावे सांगायला सुरुवात केली. बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून शिवसेनेतून दोनदा खासदार झालेले आनंद परांजपे यांचेही नाव निघाले. त्यांचे नाव तोंडातून बाहेर पडताच, क्षणभर थांबून ‘ ते जाऊ दे’ असं एकनाथ शिंदे म्हणाले; मात्र ते पुढे म्हणाले की, आनंद यांचीही पोटनिवडणूक आपण पाहिली. त्यावेळी ते नवीन होते. त्यांच्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतली; पण दुर्दैवाने नंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि म्हणूनच श्रीकांतची एण्ट्री झाली, असे शिंदे म्हणाले. यावेळी युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार सुभाष भोईर, महापौर विनीता राणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना