शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नशेखोरांनी घेतला कब्जा; जुन्या जकात नाक्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:07 IST

महापालिका मुख्यालयामागील जुन्या जकात नाका कार्यालयाची दुरवस्था झाली आहे

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका मुख्यालयामागील जुन्या जकात नाका कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची ही मालमत्ता रामभरोसे असून नशेखोरांनी तिच्यावर कब्जा केला आहे. या मालमत्तेवर राजरोसपणे अतिक्रमण होत असून, महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागे महापालिकेच्या मालकीचा तरणतलाव, जुने जकात नाका कार्यालय, कोंडवाडा, बोअरवेल कार्यालय, पालिका कॅन्टिन तसेच भाई जगताप यांची कामगार संघटना आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय होते. याशिवाय राज्य शासनाचा महिला व बाल कल्याण विभाग आणि दुकान परवान्याचे कार्यालयही होते. त्यापैकी तरणतलाव पालिकेने बीओटी तत्त्वावर दिला असून, इमारत धोकादायक झाल्याचे दाखवून महिला व बालकल्याण तसेच दुकान परवाना कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. इतर कार्यालयेदेखील मुख्यालयात हलविण्यात आली आहेत. राज्य शासनाने जकात बंद करून एलबीटी लागू केल्याने, जकात नाक्याचे कार्यालय कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला वापरण्यासाठी देण्यात आले. जकात नाक्याचे कार्यालय कोणार्क कंपनीच्या ठेकेदारास वापरण्यासाठी दिल्यानंतर, जागा कमी पडत असल्याचे कारण सांगून या ठेकेदाराने कार्यालयासमोरील कोंडवाडा विनापरवाना जमीनदोस्त केला. या कोंडवाड्याचा वापरही त्याने विनापरवाना सुरू केला. महासभेत कोंडवाडा हरवल्याच्या मुद्द्यावर गदारोळ झाल्यानंतर, कोंडवाडा बांधून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. मात्र ठेकेदाराने कोंडवाडा कुठे बांधला, याचा थांगपत्ता सामान्य नागरिकांसह नगरसेवकांनाही लागला नाही. महापालिकाही या मुद्द्यावर तोंड उघडण्यास तयार नाही. जकात नाक्याचे कार्यालय वापरण्यापोटी भाड्याचा विषय चर्चेला येताच ठेकेदाराने कार्यालय इतरत्र हलविले. त्यानंतर महापालिकेनेही दुर्लक्ष केल्याने या बेवारस जकातनाक्याचा ताबा नशेखोरांनी घेतला. तेव्हापासून या कार्यालयाचा दुरुपयोग होत असून, असामाजिक तत्त्वांमुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.विकासकांकडूनही उल्हासनगर पालिकेची फसवणूकमहापालिकेच्या बंद पडलेल्या अनेक शौचालयांवर आता अतिक्रमण झाले असून, ७० टक्के खुल्या जागा व आरक्षित भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विभागांमध्ये समाजमंदिरे बांधण्यात आली असून, त्यांच्या ताब्याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.पालिकेने १८ आरक्षित भूखंड बिल्डरांना विकसित करण्यासाठी दिले. भूखंड विकसित झाल्यानंतर २० टक्के विकसित मालमत्ता पालिकेला हस्तांतरित करण्याची अट आहे. प्रत्यक्षात २ ते ३ विकासकांनीच जागा हस्तांतरित केल्या असून इतर विकासक कोट्यवधी रुपयांच्या जागेचा वापर करून लाखो रुपये भाड्यापोटी कमवत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षही याविरोधात ब्र शब्द काढण्यास तयार नाहीत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थulhasnagarउल्हासनगर