शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नशेखोरांनी घेतला कब्जा; जुन्या जकात नाक्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:07 IST

महापालिका मुख्यालयामागील जुन्या जकात नाका कार्यालयाची दुरवस्था झाली आहे

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका मुख्यालयामागील जुन्या जकात नाका कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची ही मालमत्ता रामभरोसे असून नशेखोरांनी तिच्यावर कब्जा केला आहे. या मालमत्तेवर राजरोसपणे अतिक्रमण होत असून, महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागे महापालिकेच्या मालकीचा तरणतलाव, जुने जकात नाका कार्यालय, कोंडवाडा, बोअरवेल कार्यालय, पालिका कॅन्टिन तसेच भाई जगताप यांची कामगार संघटना आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय होते. याशिवाय राज्य शासनाचा महिला व बाल कल्याण विभाग आणि दुकान परवान्याचे कार्यालयही होते. त्यापैकी तरणतलाव पालिकेने बीओटी तत्त्वावर दिला असून, इमारत धोकादायक झाल्याचे दाखवून महिला व बालकल्याण तसेच दुकान परवाना कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. इतर कार्यालयेदेखील मुख्यालयात हलविण्यात आली आहेत. राज्य शासनाने जकात बंद करून एलबीटी लागू केल्याने, जकात नाक्याचे कार्यालय कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला वापरण्यासाठी देण्यात आले. जकात नाक्याचे कार्यालय कोणार्क कंपनीच्या ठेकेदारास वापरण्यासाठी दिल्यानंतर, जागा कमी पडत असल्याचे कारण सांगून या ठेकेदाराने कार्यालयासमोरील कोंडवाडा विनापरवाना जमीनदोस्त केला. या कोंडवाड्याचा वापरही त्याने विनापरवाना सुरू केला. महासभेत कोंडवाडा हरवल्याच्या मुद्द्यावर गदारोळ झाल्यानंतर, कोंडवाडा बांधून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. मात्र ठेकेदाराने कोंडवाडा कुठे बांधला, याचा थांगपत्ता सामान्य नागरिकांसह नगरसेवकांनाही लागला नाही. महापालिकाही या मुद्द्यावर तोंड उघडण्यास तयार नाही. जकात नाक्याचे कार्यालय वापरण्यापोटी भाड्याचा विषय चर्चेला येताच ठेकेदाराने कार्यालय इतरत्र हलविले. त्यानंतर महापालिकेनेही दुर्लक्ष केल्याने या बेवारस जकातनाक्याचा ताबा नशेखोरांनी घेतला. तेव्हापासून या कार्यालयाचा दुरुपयोग होत असून, असामाजिक तत्त्वांमुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.विकासकांकडूनही उल्हासनगर पालिकेची फसवणूकमहापालिकेच्या बंद पडलेल्या अनेक शौचालयांवर आता अतिक्रमण झाले असून, ७० टक्के खुल्या जागा व आरक्षित भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विभागांमध्ये समाजमंदिरे बांधण्यात आली असून, त्यांच्या ताब्याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.पालिकेने १८ आरक्षित भूखंड बिल्डरांना विकसित करण्यासाठी दिले. भूखंड विकसित झाल्यानंतर २० टक्के विकसित मालमत्ता पालिकेला हस्तांतरित करण्याची अट आहे. प्रत्यक्षात २ ते ३ विकासकांनीच जागा हस्तांतरित केल्या असून इतर विकासक कोट्यवधी रुपयांच्या जागेचा वापर करून लाखो रुपये भाड्यापोटी कमवत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षही याविरोधात ब्र शब्द काढण्यास तयार नाहीत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थulhasnagarउल्हासनगर