शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घ्या; पण अंतरावरूनच! सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर

By सुरेश लोखंडे | Updated: August 3, 2023 21:18 IST

पर्यटनाच आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर

ठाणे : जिल्ह्यातील धोक्याच्या ठिकाणांवरील धबधबे, नदीचा प्रवाह, डोंगर कडे आदी ठिकाणांपासून एक किलो मीटर अंतरावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येत नव्हता. पण आता ही अट काही अंशी शिथील करून या ठिकाणाजवळ पर्यटकांना जाता येईल. पाण्यात उतरता येणार नाही. तेथील स्थितीचा आंदाज घेऊन स्थानिक प्रशासनाने,पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेची उपाययोजना करावी, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आज जारी केले आहे.

जिल्ह्यातील डोंगर, माळरानावर सध्याच्या पावसाने नदी,नाले, धबधबे जोरात वाहत आहेत. मात्र या स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यापासून तब्बल एक किमी. अंतरावर बंदी घातली होती. त्यामुळे पर्यटकांना या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नव्हता. तो घेता यावा. यासाठी अटी शिथील करण्याच्या मागणीचे निवेदने जिल्ह्याभरातून आले होते. त्यास विचारात घेऊन पर्यटकांना जवळजाऊन आनंद घेता यावा, पण त्यांच्या सुरक्षेला महत्त्व देत स्थानिक प्रशासनाने तेथील स्थिती लक्षात घेऊन सुरक्षेचा बंदोबस्त करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे शिनगारे यांनी लोकमतला सांगितले.        

सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धबधबे व नद्यांच्या पाण्याचा वेग वाढलेला आहे. त्यापासून जीवित हानी झाल्याच्या घटना आधी घडलेल्या आहेत. त्यास विचारात घेऊन या ठिकाणांच्या अगदी जवळ पर्यटकांनी जाऊ नये. वाहत्या पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. याशिवाय पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन पोलिस व स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेव्यात,असेही शिनगारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पर्यटकांनी या पर्यटन स्थळांचा आनंद घेताना सुरक्षेची काळजी स्वतःही घेणे गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :thaneठाणे