शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सुटीचा आनंद घेण्यासाठी बदलापूरचे बॅरेज धरण पर्यटकांनी फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:14 IST

नैसर्गिक तरणतलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे. या पात्रात कमरेएवढे पाणी असल्याने ते पर्यटकांसाठी सुरक्षित मानले जाते.

बदलापूर : ज्या उल्हास नदीतून पाणी उचलण्यासाठी बंधारा उभारण्यात आला आहे, त्या बंधाऱ्यावरून वाहणाºया पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद नागरिक घेत आहेत. धरणातून बाहेर पडणाºया पाण्यात भिजताना जीवितास धोका नसल्याने अनेक पर्यटक हे कुटुंबासह या ठिकाणी येतात. अत्यंत सुरक्षित हा बंधारा असल्याने आता उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे.

बदलापूर शहरापासून काही अंतरावर उल्हास नदीच्या तीरावर हा बॅरेजचा बंधारा उभारण्यात आला आहे. २००५ च्या महापुरात ब्रिटिशकालीन बॅरेज धरण उद्ध्वस्त झाल्याने नदीपात्रातील पाणी उचलण्यासाठी लागलीच वर्षभराच्या आतच नव्या बंधाºयाचे काम पूर्ण करण्यात आले. २००७ मध्ये सरकारने उल्हास नदीवर हा बंधारा उभारला. उल्हास नदी ही बारमाही वाहणारी नदी असल्याने या ठिकाणी बंधाºयावरून पाणी वाहत असते. आंध्र धरणातील पाणी सोडल्यावर बॅरेज धरणावर सर्वात आधी पाणी अडवून त्यातून पाणी उचलण्यात येते. त्यानंतर, अतिरिक्त पाणी हे नैसर्गिक प्रवाहाच्या माध्यमातून बंधाºयावरून वाहत जाते. बंधाºयातून बाहेर पडणारा पाण्याचा प्रवाह हा धरणाच्या सौंदर्यात भर घालतो. त्यामुळे असंख्य पर्यटकही या निसर्गाच्या सान्निध्यात तयार झालेल्या नदी प्रवाहात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. बंधाºयापासून २० ते २५ फूट अंतरापर्यंत काँक्रिटीकरण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना नदीपात्रातील दगडगोटे पायाला लागण्याची भीती नाही.

नैसर्गिक तरणतलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे. या पात्रात कमरेएवढे पाणी असल्याने ते पर्यटकांसाठी सुरक्षित मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कुटुंब आणि मित्रपरिवारासह येणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी आणि रविवारी याठिकाणी शेकडो पर्यटक येतात. सुरक्षित ठिकाणी पोहण्याचा आनंद घेणाºयांना कोणताच धोका नाही. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक हे दारू पिऊन धरणाच्या पात्रात पोहण्याचा प्रयत्न करतात. या पर्यटकांमुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. धरणाच्या खोल पातळीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अनेक जण त्या पात्रात बुडाले आहेत. त्यातच या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेच उपाय नसल्याने अतिउत्साही पर्यटकांना रोखणे अवघड जाते. मात्र, जे धरणाच्या खालच्या पाण्याच्या प्रवाहात आनंद घेतात. त्यांना याठिकाणी कोणताच धोका नाही.

टॅग्स :badlapurबदलापूर