शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सुटीचा आनंद घेण्यासाठी बदलापूरचे बॅरेज धरण पर्यटकांनी फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:14 IST

नैसर्गिक तरणतलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे. या पात्रात कमरेएवढे पाणी असल्याने ते पर्यटकांसाठी सुरक्षित मानले जाते.

बदलापूर : ज्या उल्हास नदीतून पाणी उचलण्यासाठी बंधारा उभारण्यात आला आहे, त्या बंधाऱ्यावरून वाहणाºया पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद नागरिक घेत आहेत. धरणातून बाहेर पडणाºया पाण्यात भिजताना जीवितास धोका नसल्याने अनेक पर्यटक हे कुटुंबासह या ठिकाणी येतात. अत्यंत सुरक्षित हा बंधारा असल्याने आता उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे.

बदलापूर शहरापासून काही अंतरावर उल्हास नदीच्या तीरावर हा बॅरेजचा बंधारा उभारण्यात आला आहे. २००५ च्या महापुरात ब्रिटिशकालीन बॅरेज धरण उद्ध्वस्त झाल्याने नदीपात्रातील पाणी उचलण्यासाठी लागलीच वर्षभराच्या आतच नव्या बंधाºयाचे काम पूर्ण करण्यात आले. २००७ मध्ये सरकारने उल्हास नदीवर हा बंधारा उभारला. उल्हास नदी ही बारमाही वाहणारी नदी असल्याने या ठिकाणी बंधाºयावरून पाणी वाहत असते. आंध्र धरणातील पाणी सोडल्यावर बॅरेज धरणावर सर्वात आधी पाणी अडवून त्यातून पाणी उचलण्यात येते. त्यानंतर, अतिरिक्त पाणी हे नैसर्गिक प्रवाहाच्या माध्यमातून बंधाºयावरून वाहत जाते. बंधाºयातून बाहेर पडणारा पाण्याचा प्रवाह हा धरणाच्या सौंदर्यात भर घालतो. त्यामुळे असंख्य पर्यटकही या निसर्गाच्या सान्निध्यात तयार झालेल्या नदी प्रवाहात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. बंधाºयापासून २० ते २५ फूट अंतरापर्यंत काँक्रिटीकरण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना नदीपात्रातील दगडगोटे पायाला लागण्याची भीती नाही.

नैसर्गिक तरणतलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे. या पात्रात कमरेएवढे पाणी असल्याने ते पर्यटकांसाठी सुरक्षित मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कुटुंब आणि मित्रपरिवारासह येणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी आणि रविवारी याठिकाणी शेकडो पर्यटक येतात. सुरक्षित ठिकाणी पोहण्याचा आनंद घेणाºयांना कोणताच धोका नाही. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक हे दारू पिऊन धरणाच्या पात्रात पोहण्याचा प्रयत्न करतात. या पर्यटकांमुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. धरणाच्या खोल पातळीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अनेक जण त्या पात्रात बुडाले आहेत. त्यातच या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेच उपाय नसल्याने अतिउत्साही पर्यटकांना रोखणे अवघड जाते. मात्र, जे धरणाच्या खालच्या पाण्याच्या प्रवाहात आनंद घेतात. त्यांना याठिकाणी कोणताच धोका नाही.

टॅग्स :badlapurबदलापूर