शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

म्हाडामधील सुविधा भुखंडावर अतिक्रमण, कॉंग्रेसचा गंभीर आरोप

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 15:37 IST

येथील सुविधा भुखंडावर अतिक्रमण झाले असून येथील अनेक भुखंड गिळंकृत करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ठाणे : वर्तक भागात म्हाडा वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून याला ठाण्यातील काही बडे राजकीय नेते, पालिका अधिकारी, म्हाडाचे अधिकारी खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. येथील सुविधा भुखंडावर अतिक्रमण झाले असून येथील अनेक भुखंड गिळंकृत करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना योग्य त्या सोई सुविधा दिल्या नाहीत, आणि येथील भुखंड विकसित केले गेले नाही तर कॉंग्रेस उपोषणाचे हत्यार उपसेल असा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्यात वर्तक नगर, शिवाई नगर आणि वसंत विहार येथे म्हाडाच्या इमारती आहेत. तर वर्तक नगर भागात चाळी देखील आहेत. परंतु येथील इमरतींचा आणि चाळींचा पुनर्विकास रखडला असल्याचे माहिती त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. वर्तक नगर येथे १६ एकरचा म्हाडाचा भुखंड आहे. याठिकाणी १९६० पासून चाळींची आणि इमारतींची बांधणी करण्यात आली. याठिकाणी ७२ इमारती असून १९ च्या आसपास चाळी आहेत.

१९९० मध्ये येथील आरखडा नव्याने मंजुर झाल्यानंतर त्याठिकाणी डीपी रस्ता, शाळा, पोस्ट आॅफीस, हॉस्पीटल आदींसह मुलभुत सोई सुविधा उपलब्ध होतील या अनुषंगाने त्याचे नियोजन आखण्यात आले होते. परंतु त्या सुविधा भुखंडावर किंबहुना राखीव भुखंडावर अतिक्रमण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा आराखडा मंजुरीसाठी आला असता, तेव्हा या भागाला अडीच एफएसआय दिला गेला. परंतु हा एफएसआय देत असतांना येथे झालेले अतिक्रमण हटविणे गरजेचे होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यानुसार अहवाल तयार करण्यास सांगून काही अटी शर्ती तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांची देखील अद्याप पुर्तता झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी या भागात क्लस्टर योजना आणली जावी अशी मागणी देखील केली होती. परंतु तत्कालीन आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला मान्यता दिली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एकूणच आता येथे बडे बिल्डर घुसले असून त्यांची संघटीत टोळी या भागात कार्यरत असून तक्रार करण्यास गेल्यावर पालिकेतील शहर विकास अधिकारी धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता या भागात एफएसआयची देखील चोरी झाली असून काही ठिकाणी १५ टक्के अधिकचा एफएसआय देखील वापरला गेला आहे. वहीवाट, मिसिंग लिंक बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना न्याय मिळाला नाही तर उपोषणाचे हत्यार पुकारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस