शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:19 IST

कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली.

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली. या प्रकारानंतर महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीच्या शेजारील घरे आणि इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. त्यामुळे २०-२५ कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.वसंत बहार येथील रिकाम्या केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी सोमवारी दुपारी कोसळली. इमारत पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने महापालिका सहायक आयुक्त शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशान्वये इमारतीशेजारील घरे व इमारतीला नोटिसा दिल्या आहेत. काही घरे रिकामी केली. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीशेजारी कोणी जाऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात आले. दरम्यान, या धोकादायक इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीतील पुढच्या भागातील पाच-सहा, तर आजूबाजूच्या १५-२० घरांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.गेल्या महिन्यात १३ इमारती रिकाम्या केल्या असून त्यापैकी महेक इमारत कोसळली, तर एका इमारतीचा स्लॅब कोसळला. काही इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या असून शेकडो कुटुंबे बेघर झाली.आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी धोकादायक इमारती राज्य सरकारच्या २००६ च्या विशेष अध्यादेशानुसार नियमित करण्याचे तसेच ३० वर्षे जुन्या आणि धोकादायक इमारतीला चार चटईक्षेत्र देण्याची अधिसूचना काढली. शहरात धोकादायक व अतिधोकादायक इमारतीची संख्या २५० पेक्षा जास्त असून पुन्हा सर्वेक्षण केल्यास धोकादायक इमारतीची संख्या दामदुप्पट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय यापूर्वीच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतल्याने अनेकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.>आपत्कालीन पर्यायी व्यवस्था हवीशहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या महिन्यात १३ इमारती खाली केल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली. महापालिकेकडे तात्पुरते निवारा केंद्र व आपत्कालीन व्यवस्था नसल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना नातेवाईक अथवा भाड्याच्या घरात जावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने आपत्कालीन व्यवस्था उभी करण्याची मागणी होत आहे.