शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:19 IST

कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली.

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली. या प्रकारानंतर महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीच्या शेजारील घरे आणि इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. त्यामुळे २०-२५ कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.वसंत बहार येथील रिकाम्या केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी सोमवारी दुपारी कोसळली. इमारत पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने महापालिका सहायक आयुक्त शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशान्वये इमारतीशेजारील घरे व इमारतीला नोटिसा दिल्या आहेत. काही घरे रिकामी केली. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीशेजारी कोणी जाऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात आले. दरम्यान, या धोकादायक इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीतील पुढच्या भागातील पाच-सहा, तर आजूबाजूच्या १५-२० घरांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.गेल्या महिन्यात १३ इमारती रिकाम्या केल्या असून त्यापैकी महेक इमारत कोसळली, तर एका इमारतीचा स्लॅब कोसळला. काही इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या असून शेकडो कुटुंबे बेघर झाली.आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी धोकादायक इमारती राज्य सरकारच्या २००६ च्या विशेष अध्यादेशानुसार नियमित करण्याचे तसेच ३० वर्षे जुन्या आणि धोकादायक इमारतीला चार चटईक्षेत्र देण्याची अधिसूचना काढली. शहरात धोकादायक व अतिधोकादायक इमारतीची संख्या २५० पेक्षा जास्त असून पुन्हा सर्वेक्षण केल्यास धोकादायक इमारतीची संख्या दामदुप्पट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय यापूर्वीच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतल्याने अनेकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.>आपत्कालीन पर्यायी व्यवस्था हवीशहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या महिन्यात १३ इमारती खाली केल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली. महापालिकेकडे तात्पुरते निवारा केंद्र व आपत्कालीन व्यवस्था नसल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना नातेवाईक अथवा भाड्याच्या घरात जावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने आपत्कालीन व्यवस्था उभी करण्याची मागणी होत आहे.