शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:19 IST

कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली.

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली. या प्रकारानंतर महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीच्या शेजारील घरे आणि इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. त्यामुळे २०-२५ कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.वसंत बहार येथील रिकाम्या केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी सोमवारी दुपारी कोसळली. इमारत पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने महापालिका सहायक आयुक्त शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशान्वये इमारतीशेजारील घरे व इमारतीला नोटिसा दिल्या आहेत. काही घरे रिकामी केली. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीशेजारी कोणी जाऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात आले. दरम्यान, या धोकादायक इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीतील पुढच्या भागातील पाच-सहा, तर आजूबाजूच्या १५-२० घरांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.गेल्या महिन्यात १३ इमारती रिकाम्या केल्या असून त्यापैकी महेक इमारत कोसळली, तर एका इमारतीचा स्लॅब कोसळला. काही इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या असून शेकडो कुटुंबे बेघर झाली.आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी धोकादायक इमारती राज्य सरकारच्या २००६ च्या विशेष अध्यादेशानुसार नियमित करण्याचे तसेच ३० वर्षे जुन्या आणि धोकादायक इमारतीला चार चटईक्षेत्र देण्याची अधिसूचना काढली. शहरात धोकादायक व अतिधोकादायक इमारतीची संख्या २५० पेक्षा जास्त असून पुन्हा सर्वेक्षण केल्यास धोकादायक इमारतीची संख्या दामदुप्पट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय यापूर्वीच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतल्याने अनेकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.>आपत्कालीन पर्यायी व्यवस्था हवीशहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या महिन्यात १३ इमारती खाली केल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली. महापालिकेकडे तात्पुरते निवारा केंद्र व आपत्कालीन व्यवस्था नसल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना नातेवाईक अथवा भाड्याच्या घरात जावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने आपत्कालीन व्यवस्था उभी करण्याची मागणी होत आहे.