शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे: रविंद्र चव्हाण

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 8, 2022 17:08 IST

कोकणातील १० आदर्श संस्थाचालक व ११५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे. त्यादृष्टीकोनातून नवी पिढी घडविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा. तसेच विविध भागात काम करताना एखादा विषय सखोल आत्मसात करून स्वत:ची ओळख निर्माण करावी. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ मिळणारा हा पुरस्कार गुणवंत शिक्षकांना सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे व भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील ११५ आदर्श शिक्षक आणि १० संस्थाचालकांचा वसंत स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.ठाण्यातील एम. एच. हायस्कूलच्या सभागृहात आज झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील माजी गटनेते संजय वाघुले,मनोहर डुंबरे, नारायण पवार,माजी नगरसेवक भरत चव्हाण,कृष्णा पाटील,जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सिताराम राणे,परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील,भाजपाचे शहर सरचिटणीस मनोहर सुगदरे, विरसिंग पारछा, एम. एच. हायस्कूलचे माजी प्राचार्य राजेंद्र रजपूत,भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील व इतर उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले, कोरोना आपत्तीनंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शिक्षणाच्या बदलत्या पद्धतीमुळे विद्यार्थी अस्वस्थ, तर आर्थिक परिस्थितीमुळे पालक अस्वस्थ होते. या परिस्थितीतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.यापुढील काळात भारताच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न करावा. ठाणे जिल्ह्याबरोबरच राज्याच्या राजकारणात दिवंगत वसंतराव डावखरे यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम राहील. त्यांनी कायम हसतखेळत इतरांना आनंद देण्याबरोबरच मैत्रीचे नाते कायम जपले. त्यांचे पहिल्या भेटीपासून निर्माण झालेला जिव्हाळा हजारो नागरिकांच्या मनात आहे, अशा शब्दांत मंत्री चव्हाण यांनी दिवंगत डावखरे यांच्या आठवणी विषद केल्या.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुढील वर्षी पुरस्कार : निरंजन डावखरे

विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषवितानाच अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ पुरस्काराच्या माध्यमातून कोकणाच्या विविध भागातील शिक्षकांचा गौरव केला जात आहे. संस्थाचालक व शिक्षकांप्रमाणेच अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उत्तम कार्य केले आहे. पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा आमदार व समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणेNiranjan Davkhareनिरंजन डावखरे