शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना हवी महिनाभरापेक्षा जास्त सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:41 IST

परतल्यावरही १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे होणार; ठाण्यातील कोकणवासीयांना चिंता

ठाणे : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आधीच गावी १० दिवसांचे क्वारंटाइन सक्तीचे असताना, मुंबई महापालिकेने चाकरमान्यांना परतल्यावरही पुन्हा १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणेकरांनाही परत आल्यावर १४ दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे होते की काय, अशी चिंता सतावत आहे. ठाणे महानगरपालिकेनेही तसाच निर्णय घेतल्यास चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी १0 दिवस, गावी क्वारंटाइन होण्यासाठी १० दिवस आणि परतल्यावर पुन्हा क्वारंटाइन होण्यासाठी १४ दिवस अशा तब्बल ३४ दिवसांच्या सुटीचे नियोजन करावे लागणार आहे.चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवाकरिता जाण्यासाठी एसटी बसेसची सोय केल्यावर मोठ्या संख्येने चाकरमानी आरक्षण करून कोकणात पोहोचत आहे. गणेशोत्सव करून हा चाकरमानी पुन्हा मुंबईतही परतेल. परंतु, परराज्य किंवा परजिल्ह्यांतून मुंबईत येणाऱ्यांना क्वारंटाइन सक्तीचे केले, तरच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कोकणात जाणाºया ठाणेकरांनाही क्वारंटाइनची सक्ती करणाºया ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सव आटोपून आल्यावर आणखी १४ दिवस घरीच बसवले तर काय होणार, या विचाराने ठाणेकर चिंताग्रस्त झाले आहेत. अनलॉकमध्ये काही उद्योग, कार्यालये सुरू झाली आहेत. आधीच नोकºयांची शाश्वती नसताना गणेशोत्सवाहून परतल्यावर पुन्हा १४ दिवसांची सुटी मिळणे शक्य नाही. गणेशोत्सवापेक्षा क्वारंटाइनचेच दिवस जास्त होत असल्याने चाकरमानी टेन्शनमध्ये आहेत.कोकणात जाणाºयांसाठी सरकारने १0 दिवसांचे होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. मात्र, कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी क्वारंटाइनसाठी १४ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे गावी १४ दिवस क्वारंटाइन, गणेशोत्सवाचे पाच किंवा १0 दिवस आणि पुन्हा इथे येऊन १४ दिवस क्वारंटाइन व्हायचे म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी लागणार आहे.- दीपेंद्र नाईक, ठाणेकोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी क्वारंटाइनची सक्ती करणे समजण्यासारखे आहे. पण, मग सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे. मुंबई सोडून पळालेले अनेक जण पुन्हा कामाच्या शोधात मुंबईत परतू लागले आहेत. ते सक्तीने क्वारंटाइन होतात की नाही, हे पाहण्याची तसदी कुणीही घेत नाही. मग, गणेशोत्सवासाठी जाणाºयांनाही सक्ती नसावी.- रोहिणी चेंदवणकर, ठाणेक्वारंटाइनचा नियम सर्वांच्याच भल्यासाठी आहे. बाहेरगावहून आलेल्या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइन झालेच पाहिजे, असे निर्देश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार, ठाणेकरांनीही गणेशोत्सवाहून परतल्यावर स्वत:हूनच १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे. त्यासाठी आणखी वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही.- संदीप माळवी, उपायुक्त,ठाणे महानगरपालिका