शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मीरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य कायम; पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:40 IST

नागरिक, वाहनचालक त्रस्त, वाहने झाली खिळखिळी, अनेकांना कंबर, पाठदुखीचा त्रास

मीरा रोड : काशिमीरा येथे खड्ड्याने बळी घेतल्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था आहे. पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असले, तरी बहुसंख्य खड्डे कायम आहेत. त्यामुळे नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत.पावसाळ्यात मीरा-भार्इंदरमधील डांबरी रस्ते पूर्णपणे खड्ड्यांत गेले होते. पालिकेने भरपावसात पॅचवर्कची कामे केल्याने ते पॅचवर्कही पावसाने धुऊन काढले. त्यामुळे पॅचवर्कचे काही कोटी वाया गेल्याचा आरोप होत आहे. मुळात डांबरी रस्ता बनवताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. चांगल्या दर्जाचे डांबर व बांधकाम साहित्य वापरले जात नाही. रस्त्यांचा समतोल राखला जात नाही. विविध कामांसाठी खोदकाम केल्यानंतर केले जाणारे पॅचवर्कही थातूरमातूर असते. टेंडर आणि टक्केवारी या निकृष्ट आणि दर्जाहीन कामास कारणीभूत असल्याचे आरोप व तक्रारी सातत्याने होत आहेत.खड्ड्यांमुळे नागरिक तसेच वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. अपघाताचा धोका तसेच नागरिकांना कंबर, पाठ, मानदुखीचा विकार बळावतो. वाहनांचा खुळखुळा होऊन नुकसान होते ते वेगळेच. यंदाही खड्ड्यांमुळे काशिमीरा येथे तरुणाचा बळी गेला होता. तर, महापौर मॅरेथॉनसाठीच्या मार्गावर रातोरात खड्डे भरणाऱ्या पालिका आणि सत्ताधाऱ्यांना शहरातील अन्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवावेसे वाटले नाहीत, यावरून टीकेची झोड उठली होती. पावसाळा यंदा लांबला असतानाच मधल्या काळात खड्डे भरण्यासाठी टाकलेली खडी निघाल्याने नागरिकांना आणखीनच त्रास झाला. परंतु, पावसाळा गेला असला तरी शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य मात्र कायम आहे. खड्डेही खोल व मोठे असल्याने अपघाताची भीती कायम आहे. दुचाकीस्वारांना तर खड्डे सांभाळून वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असले, तरी मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.यंदा पावसाळा लांबल्याने खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. आम्हीदेखील सतत तक्रारी केल्या असून आता पालिकेने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. तरीही खड्डे अजूनही आहेत ही वस्तुस्थिती आहे. शहरातील सर्व खड्डे लवकरात लवकर भरून नागरिकांना दिलासा द्यावा.- नीला सोन्स, नगरसेविकामीरा-भार्इंदर महापालिकेतील टेंडर-टक्केवारीचे आरोप गंभीर असून शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था हा त्याचा बोलका पुरावा मानायला हवा. त्यातूनच निकृष्ट आणि अतांत्रिक दर्जाची कामे होत असल्याने खड्डे यावेळी मोठ्या प्रमाणात पडले आहेत. कामांचा दर्जा सुधारा आणि अर्थपूर्ण हेतूने चालणारा हस्तक्षेप थांबवून त्वरित खड्डे भरण्यात यावेत.- शंकर वीरकर, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना