शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेचा डाग पुसण्यावर सेनेच्या ‘परिवर्तन’चा भर

By admin | Updated: May 9, 2016 01:59 IST

कल्याण-डोंबिवली शहरांचा अस्वच्छ शहरांच्या यादीत समावेश झाल्याने तेथे दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शिवसेनेने हा डाग पुसून काढण्यासाठी स्वच्छतेचे शहरांच्या ‘परिवर्तना’चे अभियान छेडले.

मुरलीधर भवार, कल्याणकल्याण-डोंबिवली शहरांचा अस्वच्छ शहरांच्या यादीत समावेश झाल्याने तेथे दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शिवसेनेने हा डाग पुसून काढण्यासाठी स्वच्छतेचे शहरांच्या ‘परिवर्तना’चे अभियान छेडले. अभियान जरी कल्याण-डोंबिवली पालिका राबविणार असली तरी त्याची मूळ संकल्पना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या मोहीमेला शिवसेनेतून प्रतिसाद मिळेल. पण भाजपाने त्यातून अंग काढून घेतल्याने ही योजना शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून योजनेत सासत्य राखण्याचे आव्हान शिवसेनेला पेलावे लागणार आहे. अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाल्याचे कळताच ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांना बोलावून त्यांची कानउघडणी केली होती. त्यातूनच ‘परिवर्तन’चा जन्म झाला. त्यानुसार शनिवारी तिचा शुभारंभ झाला. त्यासाठीच्या दौऱ्यात उद्धव यांनी त्यांनी शारदा मंदिर शाळेत काहीजणांच्या भेटी घेतल्या. समांतर रस्त्यावरील सेल्फी पाईंटचे उद्घाटन झाले. ह्रदयाच्या आकाराचा हा सेल्फी पॉईंट आकर्षण ठरला आहे. शहरात कचरा नियमित उचलला जात नाही. महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी काही प्रयत्न केले नाही, अशी ओरड केली जाते. प्रत्यक्षात नागरिकांनाही कचरा व्यवस्थापनाची चांगली सवय नाही. ती लावली जाणार आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जाते. घराची दुरुस्ती केल्यावर जो काही घनकचरा तयार होतो तो देखील रस्ते-गटारात टाकला जातो. त्यावर नियंत्रण आणले जाणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यावर बंदी आणणे हे त्यातीलच एक पाऊल आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचा, कॉलेज यांचा सहभाग घेणे. हा सहभाग अपेक्षित असल्याने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. नरेशचंद्र व डोंबिवलीत व्हिजन डोंबिवली हा प्रकल्प राबविणारे डॉ. उल्हास कोल्हटकर, कल्याण रोटरीचे मिलिंद कुलकर्णी यांचीही ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्याकडूनही परिवर्तनासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वच्छ शहराच्या परिवर्तनासठी लोकसहभाग हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यातूनच परिवर्तन साध्य होणार आहे, यावर ठाकरे यांचा भर आहे.