शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

अस्वच्छतेचा डाग पुसण्यावर सेनेच्या ‘परिवर्तन’चा भर

By admin | Updated: May 9, 2016 01:59 IST

कल्याण-डोंबिवली शहरांचा अस्वच्छ शहरांच्या यादीत समावेश झाल्याने तेथे दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शिवसेनेने हा डाग पुसून काढण्यासाठी स्वच्छतेचे शहरांच्या ‘परिवर्तना’चे अभियान छेडले.

मुरलीधर भवार, कल्याणकल्याण-डोंबिवली शहरांचा अस्वच्छ शहरांच्या यादीत समावेश झाल्याने तेथे दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शिवसेनेने हा डाग पुसून काढण्यासाठी स्वच्छतेचे शहरांच्या ‘परिवर्तना’चे अभियान छेडले. अभियान जरी कल्याण-डोंबिवली पालिका राबविणार असली तरी त्याची मूळ संकल्पना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या मोहीमेला शिवसेनेतून प्रतिसाद मिळेल. पण भाजपाने त्यातून अंग काढून घेतल्याने ही योजना शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून योजनेत सासत्य राखण्याचे आव्हान शिवसेनेला पेलावे लागणार आहे. अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाल्याचे कळताच ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांना बोलावून त्यांची कानउघडणी केली होती. त्यातूनच ‘परिवर्तन’चा जन्म झाला. त्यानुसार शनिवारी तिचा शुभारंभ झाला. त्यासाठीच्या दौऱ्यात उद्धव यांनी त्यांनी शारदा मंदिर शाळेत काहीजणांच्या भेटी घेतल्या. समांतर रस्त्यावरील सेल्फी पाईंटचे उद्घाटन झाले. ह्रदयाच्या आकाराचा हा सेल्फी पॉईंट आकर्षण ठरला आहे. शहरात कचरा नियमित उचलला जात नाही. महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी काही प्रयत्न केले नाही, अशी ओरड केली जाते. प्रत्यक्षात नागरिकांनाही कचरा व्यवस्थापनाची चांगली सवय नाही. ती लावली जाणार आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जाते. घराची दुरुस्ती केल्यावर जो काही घनकचरा तयार होतो तो देखील रस्ते-गटारात टाकला जातो. त्यावर नियंत्रण आणले जाणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यावर बंदी आणणे हे त्यातीलच एक पाऊल आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचा, कॉलेज यांचा सहभाग घेणे. हा सहभाग अपेक्षित असल्याने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. नरेशचंद्र व डोंबिवलीत व्हिजन डोंबिवली हा प्रकल्प राबविणारे डॉ. उल्हास कोल्हटकर, कल्याण रोटरीचे मिलिंद कुलकर्णी यांचीही ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्याकडूनही परिवर्तनासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वच्छ शहराच्या परिवर्तनासठी लोकसहभाग हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यातूनच परिवर्तन साध्य होणार आहे, यावर ठाकरे यांचा भर आहे.