शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

कल्याण स्थानकाबाहेरील कोंडी फोडण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात ...

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात येणार आहे. यात रांग सोडून प्रवासी भाडे घ्यायचे नाही; अन्यथा १ सप्टेंबरपासून कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याणचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी रिक्षाचालकांना दिला आहे. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत येथे लोखंडी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहे, तर दुसरीकडे सोमवारपासून खासगी कंपन्यांच्या बसना स्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे जंक्शन असल्याने सार्वजनिक वाहनांसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी यासह लगतच्या ग्रामीण परिसरातून हजारो खासगी वाहने स्थानक परिसरात दर तासाला येत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारा लोंढाही मोठ्या प्रमाणात आहे. यात रस्त्यात बसणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा परिणामी स्थानकातून बाहेर पडताच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रिक्षा स्टॅण्ड, टांगा स्टॅण्ड आणि बसस्थानक हे रेल्वेस्थानकाच्या परिसरातच असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. दरम्यान, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्थानक परिसरातील विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या ठिकाणच्या बेकायदा टपऱ्या व फेरीवाले दोन वर्षांपूर्वी हटविण्यात आले होते; परंतु फेरीवाल्यांच्या अतिक्रमणासह वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

दुसरीकडे रांगेत भाडे न घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून कोंडीची समस्या निर्माण होतेच त्याचबरोबर वादावादीचे प्रकारही वारंवार घडतात. दरम्यान, आता वाहतूक पोलिसांनी अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करणाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेव्यतिरिक्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. प्रवाशांनीही बॅरिकेडसच्या बाहेरील रिक्षात बसू नये. आतील रिक्षातूनच प्रवास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

--------

खाजगी बसना स्थानक परिसरात मनाई

खासगी कंपनीच्या बसना सोमवारपासून रेल्वेस्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. दुर्गाडी येथेच त्या बस गोविंदवाडी बायपासमार्गे वळवून पत्रीपूल, पुढे एपीएमसी मार्केट, शहनाई हॉल येथे त्या पूर्णपणे थांबविल्या जातात. त्याठिकाणी यू टर्न घेऊन पुन्हा आल्यामार्गी त्या शहराबाहेर पाठविल्या जातात. परिणामी, सहजानंद चौक आणि शिवाजी चौक, तसेच स्थानक परिसरातील कोंडी ९० टक्के कमी झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. दरम्यान, असा प्रयोग डोंबिवलीतही झाला होता; परंतु नंतर तो बारगळला. त्यामुळे कल्याणचा प्रयोग यशस्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------