शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण स्थानकाबाहेरील कोंडी फोडण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात ...

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात येणार आहे. यात रांग सोडून प्रवासी भाडे घ्यायचे नाही; अन्यथा १ सप्टेंबरपासून कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याणचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी रिक्षाचालकांना दिला आहे. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत येथे लोखंडी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहे, तर दुसरीकडे सोमवारपासून खासगी कंपन्यांच्या बसना स्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे जंक्शन असल्याने सार्वजनिक वाहनांसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी यासह लगतच्या ग्रामीण परिसरातून हजारो खासगी वाहने स्थानक परिसरात दर तासाला येत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारा लोंढाही मोठ्या प्रमाणात आहे. यात रस्त्यात बसणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा परिणामी स्थानकातून बाहेर पडताच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रिक्षा स्टॅण्ड, टांगा स्टॅण्ड आणि बसस्थानक हे रेल्वेस्थानकाच्या परिसरातच असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. दरम्यान, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्थानक परिसरातील विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या ठिकाणच्या बेकायदा टपऱ्या व फेरीवाले दोन वर्षांपूर्वी हटविण्यात आले होते; परंतु फेरीवाल्यांच्या अतिक्रमणासह वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

दुसरीकडे रांगेत भाडे न घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून कोंडीची समस्या निर्माण होतेच त्याचबरोबर वादावादीचे प्रकारही वारंवार घडतात. दरम्यान, आता वाहतूक पोलिसांनी अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करणाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेव्यतिरिक्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. प्रवाशांनीही बॅरिकेडसच्या बाहेरील रिक्षात बसू नये. आतील रिक्षातूनच प्रवास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

--------

खाजगी बसना स्थानक परिसरात मनाई

खासगी कंपनीच्या बसना सोमवारपासून रेल्वेस्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. दुर्गाडी येथेच त्या बस गोविंदवाडी बायपासमार्गे वळवून पत्रीपूल, पुढे एपीएमसी मार्केट, शहनाई हॉल येथे त्या पूर्णपणे थांबविल्या जातात. त्याठिकाणी यू टर्न घेऊन पुन्हा आल्यामार्गी त्या शहराबाहेर पाठविल्या जातात. परिणामी, सहजानंद चौक आणि शिवाजी चौक, तसेच स्थानक परिसरातील कोंडी ९० टक्के कमी झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. दरम्यान, असा प्रयोग डोंबिवलीतही झाला होता; परंतु नंतर तो बारगळला. त्यामुळे कल्याणचा प्रयोग यशस्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------