शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भारनियमनामुळे असंतोष :शहापुरात आंदोलनांचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:14 IST

पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली

शहापूर : पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली आणि उपस्थितांना जाब विचारला. तर चांग्याचापाडा येथील ट्रान्सफॉर्मर १३ दिवस बंद असूनही त्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने शेणवा-डोळखांब रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको करून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा निषेध केला.नेहरोली परिसरात विजेचा दाब कमी आहे. शिवाय भारनियमनामुळे अंधाराचा सामना करावा लागतो आहे. कृत्रिम पाणीटंचाई सुरू आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. पण अधिकारी जागेवर नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.शहापूर शहरासह अर्जुनली, खरीवली, बामणे स्विचिंग स्टेशन, भटपाडा, सरलांबे, कोळकवाडी, मांजरे, टेंभुर्ली, कुल्हे येथील उच्च दाबाचे नऊ खांब आणि लघुदाबाचे २७ खांब वाकले असून वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. शहापूर पाणी योजनेचा पंप असणारा ट्रान्सफॉर्मर, उंबरवाडी व तलवाडा येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून बहुतांश ठिकाणी विजेअभावी पाणीयोजना ठप्प आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर झाले आहे.आधीच सहा ते आठ तास भारनियमन सुरू असताना वादळी-वाºयासह झालेल्या परतीच्या पावसामुळे रविवारी संध्याकाळी शहापुरातील शिवशक्ती राईसमिलजवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि संध्याकाळी 5पाचपासून वीज बेपत्ता झाली आणि शहापूर तालुका अंधारात बुडाला. भारिनयमनापेक्षाही अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने आणि वारंवार सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहापुरातील नागरिक, तालुक्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत कधी होईल, या बाबत विचारणा करण्याकरिता महावितरण कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तेथे कोणीही फोन उचलत नसल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढत गेला. अखेर सात तासांनी म्हणजे मध्यरात्री १२ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर सोमवार सकाळपासून पुन्हा भारनियमनामुळे बत्ती गुल झाली. शहापूर शहरात सतत विजेचा लपंडाव सुरूच असून नागरिकांत प्रचंड संताप आहे.परतीच्या पावसामुळे खर्डीत वीज जाण्याचे प्रकार वाढले-खर्डी : परतीच्या पावसामुळे विजेसह वादळी वाºयाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे खर्डी विभागाची बत्ती गुल होण्यात वाढ झाली असून रात्र अंधारात काढावी लागते. दोनतीन दिवसांपासून दुपारनंतर उकाड्याने अंगाची लाहीलाही होते. परतीच्या पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले की, काळोखाचे वातावरण तयार होते. वादळी वाºयासह विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होतो. बरोबर त्याच काळात घरातील वीजही गुल होते. ती कधी मध्यरात्री, तर कधी पहाटे येते. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, गृहिणीचा स्वयंपाक रखडतो.रात्री डासांमुळे झोपेचेही तीनतेरा वाजत आहेत. दुपारनंतर वीज नसल्याने पाणी योजनेचे पंपिंग होत नाही आणि नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर महिलांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. पाऊस नसतानाही अखंडित वीज नसल्याने लोक पुरते हैराण झाले आहेत. सणासुदीचे दिवस असून संध्याकाळी पावसामुळे वीज सतत जाण्याने व्यापाºयांच्या धंद्यावरही परिणाम झाला आहे. वीज वितरण कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊनही वीजसेवेत कोणतीही सुधारणा होत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये संताप आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनthaneठाणे