शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भारनियमनामुळे असंतोष :शहापुरात आंदोलनांचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:14 IST

पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली

शहापूर : पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली आणि उपस्थितांना जाब विचारला. तर चांग्याचापाडा येथील ट्रान्सफॉर्मर १३ दिवस बंद असूनही त्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने शेणवा-डोळखांब रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको करून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा निषेध केला.नेहरोली परिसरात विजेचा दाब कमी आहे. शिवाय भारनियमनामुळे अंधाराचा सामना करावा लागतो आहे. कृत्रिम पाणीटंचाई सुरू आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. पण अधिकारी जागेवर नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.शहापूर शहरासह अर्जुनली, खरीवली, बामणे स्विचिंग स्टेशन, भटपाडा, सरलांबे, कोळकवाडी, मांजरे, टेंभुर्ली, कुल्हे येथील उच्च दाबाचे नऊ खांब आणि लघुदाबाचे २७ खांब वाकले असून वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. शहापूर पाणी योजनेचा पंप असणारा ट्रान्सफॉर्मर, उंबरवाडी व तलवाडा येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून बहुतांश ठिकाणी विजेअभावी पाणीयोजना ठप्प आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर झाले आहे.आधीच सहा ते आठ तास भारनियमन सुरू असताना वादळी-वाºयासह झालेल्या परतीच्या पावसामुळे रविवारी संध्याकाळी शहापुरातील शिवशक्ती राईसमिलजवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि संध्याकाळी 5पाचपासून वीज बेपत्ता झाली आणि शहापूर तालुका अंधारात बुडाला. भारिनयमनापेक्षाही अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने आणि वारंवार सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहापुरातील नागरिक, तालुक्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत कधी होईल, या बाबत विचारणा करण्याकरिता महावितरण कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तेथे कोणीही फोन उचलत नसल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढत गेला. अखेर सात तासांनी म्हणजे मध्यरात्री १२ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर सोमवार सकाळपासून पुन्हा भारनियमनामुळे बत्ती गुल झाली. शहापूर शहरात सतत विजेचा लपंडाव सुरूच असून नागरिकांत प्रचंड संताप आहे.परतीच्या पावसामुळे खर्डीत वीज जाण्याचे प्रकार वाढले-खर्डी : परतीच्या पावसामुळे विजेसह वादळी वाºयाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे खर्डी विभागाची बत्ती गुल होण्यात वाढ झाली असून रात्र अंधारात काढावी लागते. दोनतीन दिवसांपासून दुपारनंतर उकाड्याने अंगाची लाहीलाही होते. परतीच्या पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले की, काळोखाचे वातावरण तयार होते. वादळी वाºयासह विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होतो. बरोबर त्याच काळात घरातील वीजही गुल होते. ती कधी मध्यरात्री, तर कधी पहाटे येते. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, गृहिणीचा स्वयंपाक रखडतो.रात्री डासांमुळे झोपेचेही तीनतेरा वाजत आहेत. दुपारनंतर वीज नसल्याने पाणी योजनेचे पंपिंग होत नाही आणि नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर महिलांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. पाऊस नसतानाही अखंडित वीज नसल्याने लोक पुरते हैराण झाले आहेत. सणासुदीचे दिवस असून संध्याकाळी पावसामुळे वीज सतत जाण्याने व्यापाºयांच्या धंद्यावरही परिणाम झाला आहे. वीज वितरण कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊनही वीजसेवेत कोणतीही सुधारणा होत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये संताप आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनthaneठाणे