शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

भारनियमनामुळे असंतोष :शहापुरात आंदोलनांचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:14 IST

पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली

शहापूर : पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली आणि उपस्थितांना जाब विचारला. तर चांग्याचापाडा येथील ट्रान्सफॉर्मर १३ दिवस बंद असूनही त्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने शेणवा-डोळखांब रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको करून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा निषेध केला.नेहरोली परिसरात विजेचा दाब कमी आहे. शिवाय भारनियमनामुळे अंधाराचा सामना करावा लागतो आहे. कृत्रिम पाणीटंचाई सुरू आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. पण अधिकारी जागेवर नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.शहापूर शहरासह अर्जुनली, खरीवली, बामणे स्विचिंग स्टेशन, भटपाडा, सरलांबे, कोळकवाडी, मांजरे, टेंभुर्ली, कुल्हे येथील उच्च दाबाचे नऊ खांब आणि लघुदाबाचे २७ खांब वाकले असून वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. शहापूर पाणी योजनेचा पंप असणारा ट्रान्सफॉर्मर, उंबरवाडी व तलवाडा येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून बहुतांश ठिकाणी विजेअभावी पाणीयोजना ठप्प आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर झाले आहे.आधीच सहा ते आठ तास भारनियमन सुरू असताना वादळी-वाºयासह झालेल्या परतीच्या पावसामुळे रविवारी संध्याकाळी शहापुरातील शिवशक्ती राईसमिलजवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि संध्याकाळी 5पाचपासून वीज बेपत्ता झाली आणि शहापूर तालुका अंधारात बुडाला. भारिनयमनापेक्षाही अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने आणि वारंवार सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहापुरातील नागरिक, तालुक्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत कधी होईल, या बाबत विचारणा करण्याकरिता महावितरण कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तेथे कोणीही फोन उचलत नसल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढत गेला. अखेर सात तासांनी म्हणजे मध्यरात्री १२ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर सोमवार सकाळपासून पुन्हा भारनियमनामुळे बत्ती गुल झाली. शहापूर शहरात सतत विजेचा लपंडाव सुरूच असून नागरिकांत प्रचंड संताप आहे.परतीच्या पावसामुळे खर्डीत वीज जाण्याचे प्रकार वाढले-खर्डी : परतीच्या पावसामुळे विजेसह वादळी वाºयाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे खर्डी विभागाची बत्ती गुल होण्यात वाढ झाली असून रात्र अंधारात काढावी लागते. दोनतीन दिवसांपासून दुपारनंतर उकाड्याने अंगाची लाहीलाही होते. परतीच्या पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले की, काळोखाचे वातावरण तयार होते. वादळी वाºयासह विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होतो. बरोबर त्याच काळात घरातील वीजही गुल होते. ती कधी मध्यरात्री, तर कधी पहाटे येते. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, गृहिणीचा स्वयंपाक रखडतो.रात्री डासांमुळे झोपेचेही तीनतेरा वाजत आहेत. दुपारनंतर वीज नसल्याने पाणी योजनेचे पंपिंग होत नाही आणि नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर महिलांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. पाऊस नसतानाही अखंडित वीज नसल्याने लोक पुरते हैराण झाले आहेत. सणासुदीचे दिवस असून संध्याकाळी पावसामुळे वीज सतत जाण्याने व्यापाºयांच्या धंद्यावरही परिणाम झाला आहे. वीज वितरण कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊनही वीजसेवेत कोणतीही सुधारणा होत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये संताप आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनthaneठाणे