शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइनचा घोळ

By admin | Updated: June 18, 2017 02:18 IST

दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास संपवता आला नाही. या प्रक्रियेतील फार्म क्र. २ ची आॅनलाईन माहिती सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांपासून शाळेत बोलवण्यात येत आहे. परंतु,तांत्रिक समस्येमुळे वेबसाईट ओपन होत नसल्याने प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. काही शाळांनी सोमवारऐवजी मंगळवारी पालकांना अर्ज दाखल करण्यासाठी बोलावलेले आहे. या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पालकवर्गांत संताप व्यक्त होत आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना ११ वीला आॅनलाईन प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २६१ महाविद्यालये सज्ज झाली आहेत. त्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या जिल्ह्यात ९५ हजार ३६० जागी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, तांत्रिक समस्येमुळ वेबसाईट बंद आहे. यामुळे गुणवत्तेनुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात कोठेही सुरू झालेली नाही. रविवार व सोमवार वगळता शाळांनी पालकांना मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी यायला सांगितले आहे. परंतु, ठिकठिकाणच्या शाळांमधील अल्पसंख्यांक कोट्यासह व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. गुणवत्तेनुसार एकही आॅनलाईन प्रवेश सुमारे पाच दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात झालेला नसल्याचे आढळून आले आहे. आॅनलाईन फार्म भरतेवेळी विद्यार्थ्यांकडून चुका होत असल्यामुळे यंदा प्रत्येक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट सुरू नसल्यामुळे प्रवेश अर्ज सबमिट करता येत नाहीत. या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश वगळण्यात आले आहेत. यामुळे उल्हासनगर, भिवंडी आदींसह जिल्ह्यातील ठिकाणचे अल्पसंख्यांक कॉलेजेस त्यांच्या ५० टक्के आरक्षणाच्या जागांसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीस्कारत आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील ५ टक्के आरक्षित जागांसाठीदेखील प्रवेश अर्ज ठिकठिकाणी स्वीकारले जात आहेत. यासाठी बहुतांशी ठिकाणी विद्यार्थ्यांकडून कमीतकमी १०० रूपये शुल्क घेतले जात आहे. - गुणवत्तेच्या आॅनलाईन प्रवेशासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीदेखील वेबसाईटवर फार्म क्र. २ अपलोड झाला नाही. दुपारपर्यंत प्रयत्न करूनही वेबसाईट सुरळीत झाली नाही. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर संबंधीत शाळांनी विद्यार्थी व पालकांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतरही वेबसाईट सुरू न झाल्यामुळे शाळांना आजही आॅनलाईन प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. निकाल घोषीत होऊन पाच दिवस उलटलेले असतानाही जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ६०३ विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अद्यापही यशस्वीपणे पूर्ण करता आलेली नाही.