शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अकरावी आॅनलाइनचा घोळ

By admin | Updated: June 18, 2017 02:18 IST

दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास संपवता आला नाही. या प्रक्रियेतील फार्म क्र. २ ची आॅनलाईन माहिती सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांपासून शाळेत बोलवण्यात येत आहे. परंतु,तांत्रिक समस्येमुळे वेबसाईट ओपन होत नसल्याने प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. काही शाळांनी सोमवारऐवजी मंगळवारी पालकांना अर्ज दाखल करण्यासाठी बोलावलेले आहे. या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पालकवर्गांत संताप व्यक्त होत आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना ११ वीला आॅनलाईन प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २६१ महाविद्यालये सज्ज झाली आहेत. त्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या जिल्ह्यात ९५ हजार ३६० जागी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, तांत्रिक समस्येमुळ वेबसाईट बंद आहे. यामुळे गुणवत्तेनुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात कोठेही सुरू झालेली नाही. रविवार व सोमवार वगळता शाळांनी पालकांना मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी यायला सांगितले आहे. परंतु, ठिकठिकाणच्या शाळांमधील अल्पसंख्यांक कोट्यासह व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. गुणवत्तेनुसार एकही आॅनलाईन प्रवेश सुमारे पाच दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात झालेला नसल्याचे आढळून आले आहे. आॅनलाईन फार्म भरतेवेळी विद्यार्थ्यांकडून चुका होत असल्यामुळे यंदा प्रत्येक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट सुरू नसल्यामुळे प्रवेश अर्ज सबमिट करता येत नाहीत. या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश वगळण्यात आले आहेत. यामुळे उल्हासनगर, भिवंडी आदींसह जिल्ह्यातील ठिकाणचे अल्पसंख्यांक कॉलेजेस त्यांच्या ५० टक्के आरक्षणाच्या जागांसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीस्कारत आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील ५ टक्के आरक्षित जागांसाठीदेखील प्रवेश अर्ज ठिकठिकाणी स्वीकारले जात आहेत. यासाठी बहुतांशी ठिकाणी विद्यार्थ्यांकडून कमीतकमी १०० रूपये शुल्क घेतले जात आहे. - गुणवत्तेच्या आॅनलाईन प्रवेशासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीदेखील वेबसाईटवर फार्म क्र. २ अपलोड झाला नाही. दुपारपर्यंत प्रयत्न करूनही वेबसाईट सुरळीत झाली नाही. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर संबंधीत शाळांनी विद्यार्थी व पालकांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतरही वेबसाईट सुरू न झाल्यामुळे शाळांना आजही आॅनलाईन प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. निकाल घोषीत होऊन पाच दिवस उलटलेले असतानाही जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ६०३ विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अद्यापही यशस्वीपणे पूर्ण करता आलेली नाही.