शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वीजचोरी बेतली निर्दोष तरुणाच्या जीवावर; ठाण्यात विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:43 IST

शिवाजीनगर भागात ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यातून एका केबलच्या आधारे वीजचोरी केली जात होती.

ठाणे : शिवाजीनगर भागात ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यातून एका केबलच्या आधारे वीजचोरी केली जात होती. याच केबलमधील विजेचा धक्का निर्दोष मंदार गौरी (१७) या मुलाला बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीजचोरी करणारे आणि महापालिकेच्या बेपर्वाईने मुलाचा बळी गेल्याचे बाेलले जात आहे.

केबलमधील विजेचा धक्का मंदारला बसला आणि तो जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कळव्यातील न्यू शिवाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणेच तलाव तुडुंब भरलेला होता. गुरुवारी दिवसभर संततधार पावसामुळे तलावाचे पाणी रस्त्यावर येऊन गुडघाभर पाणी साचले होते. तलावाच्या बाजूने मंदार जात असताना ठाणे महापालिकेच्या पथदिव्याच्या खांबाच्या केबलचा शॉक लागला. पाण्यात पडलेला मंदार हा आपल्याच भागातील असल्याचे समजल्यावर या भागातील वीजप्रवाह खंडित करण्यात आला. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

वेळेत दुरुस्ती झाली असती तर...

पावसाळ्यापूर्वी खांबाच्या दिव्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते; परंतु, निष्काळजीपणामुळे निर्दोष मुलाचा जीव गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशीच घटना सात ते आठ वर्षांपूर्वी जानकीनगर परिसरामध्ये स्ट्रीट लाइटचा डीपी उघडा राहिल्यामुळे घडली होती. दोनच दिवसांपूर्वी स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर स्ट्रीट लाइट डीपीचे झाकण उघडे असल्याचे एका नागरिकाने लक्षात आणून दिले होते.

टॅग्स :electricityवीज