शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ठाणे जिल्ह्यातील १३४ ग्रा.पं.च्या निवडणुका, पोटनिवडणुका घोषित; ५ नोव्हेंबरला मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: October 5, 2023 16:10 IST

निवडणुका घाेषीत झालेल्या ग्राम पंचायतींमध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ६१ ग्राम पंचायतींचा समावेश आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागाच्या गांवखेड्यांचा विकास साधणार्या १३४ ग्राम पंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घोषीत केल्या आहेत. या ग्राम पंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन ६ नोव्हेंबरला संबंधित तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात मतमाेजणी पार पडणार आहे. यास अनुसरून ठाणे अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ६ ऑक्टाेबरला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या या निवडणुका आहेत. यामध्ये मुदत संपलेल्या ६१ ग्राम पंचायती असून ७३ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुका यावेळी हाती घेतल्या आहेत. या १३४ ग्राम पंचायतींसाठी या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जिल्ह्याभरातील संबंधीत तहसीलदारांकडून काढण्यात येत आहे. या ग्राम पंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांना १६ ते २० ऑक्टाेबरराेजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तर या उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टाेबरला हाेणार आहे. यानंतर २५ ऑक्टाेबरला इच्छुकांनी माननिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे.

निवडणुका घाेषीत झालेल्या ग्राम पंचायतींमध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ६१ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर १६६ सदस्यांसह सात सरपंच पदासाठी यावेळी पाेटनिवडणूक आहे. नव्याने स्थापित व २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याचा हा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर करणेत आलेला आहे. या ग्राम पंचायतींपैकी सार्वत्रिक निवडणूकांमध्ये भिवंडीच्या १६ ग्राम पंचायती, शहापूर १६, मुरबाड २९ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर पाेट निवडणुकांमध्ये ठाणे ५, कल्याण ६, भिवंडी ५, शहापूर ४१, मुरबाड १३ आणि अंबरनाथला तीन ग्राम पंचायतींच्या पाेट निवडणुका हाती घेतल्या आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक