शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाणे जिल्ह्यातील प्रभाग रचना चुकलेल्यांसह मुदत संपलल्या १३४ ग्रा.पं.च्या निवडणुका घोषित

By सुरेश लोखंडे | Updated: October 5, 2023 17:05 IST

ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या या निवडणुका आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागाच्या गांवखेड्यांचा विकास साधणाऱ्या १३४ ग्राम पंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घोषित केल्या आहेत. या ग्राम पंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन ६ नोव्हेंबरला संबंधित तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात मतमाेजणी पार पडणार आहे. यास अनुसरून ठाणे अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ६ ऑक्टाेबरला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या या निवडणुका आहेत. यामध्ये मुदत संपलेल्या ६१ ग्राम पंचायती असून ७३ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुका यावेळी हाती घेतल्या आहेत. या १३४ ग्राम पंचायतींसाठी या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जिल्ह्याभरातील संबंधीत तहसीलदारांकडून काढण्यात येत आहे. या ग्राम पंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांना १६ ते २० ऑक्टाेबरराेजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तर या उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टाेबरला हाेणार आहे. यानंतर २५ ऑक्टाेबरला इच्छुकांनी माननिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे.

निवडणुका घाेषित झालेल्या ग्राम पंचायतींमध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ६१ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर १६६ सदस्यांसह सात सरपंच पदासाठी यावेळी पाेटनिवडणूक आहे. नव्याने स्थापित व २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याचा हा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर करणेत आलेला आहे. या ग्राम पंचायतींपैकी सार्वत्रिक निवडणूकांमध्ये भिवंडीच्या १६ ग्राम पंचायती, शहापूर १६, मुरबाड २९ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर पाेट निवडणुकांमध्ये ठाणे ५, कल्याण ६, भिवंडी ५, शहापूर ४१, मुरबाड १३ आणि अंबरनाथला तीन ग्राम पंचायतींच्या पाेट निवडणुका हाती घेतल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक