शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, कोकण पदवीधर मतदारसंघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 03:05 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता जोरदार वाजू लागले असून राष्टÑवादी आणि भाजपामधून इच्छुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूझाली आहे.

- अजित मांडकेठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता जोरदार वाजू लागले असून राष्टÑवादी आणि भाजपामधून इच्छुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूझाली आहे. परंतु, भाजपा आणि शिवसेनेने काडीमोड घेतल्याने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हे दोन पक्ष वेगळी चूल मांडणार असल्याचे चित्र जवळजवळ निश्चित मानले जात आहे. त्यानुसार, आता मतदार गोळा करण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपामधून अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे.मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. परंतु, आता संजय केळकर हे सध्या ठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार असल्याने त्यांनी यातून माघार घेतली आहे. परंतु, त्यांच्या पक्षातून अनेकांनी आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यामध्ये शहराध्यक्ष संदीप लेले यांनी यासाठी जोरदार तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच मिलिंद पाटणकर, डॉ. राजेश मढवी, विनय नातू आदींचीदेखील नावे चर्चेत आहेत. परंतु, कपिल पाटील यांच्या मुलाचे नाव मात्र जोरात चर्चेत आहे. तसेच निलेश चव्हाण हे आता भाजपात असल्याने त्यांनीदेखील यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.दुसरीकडे शिवसेना प्रथमच ही निवडणूक लढणार असल्याने त्यांनी मतदारांच्या नोंदणीस सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून शिवसेनेचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तसेच वरुण देसाई आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. कदाचित, कोकणातील आणखी एखादा चेहरा देण्याची तयारीदेखील शिवसेनेकडून सुरू आहे.जुलै महिन्यात निवडणुकीची चिन्हेयेत्या जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. यात शहरी भागातील मतदारांची संख्या वाढते आहे.यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मतदार आपले मतदान करणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदारनोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. दुसºया टप्प्यात मतदारांची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक