शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

राष्ट्रवादी बाबत निर्णय घेताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल : आव्हाड

By नितीन पंडित | Updated: September 9, 2023 19:53 IST

शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.

भिवंडी: शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. निवडणूक चिन्ह व पक्ष असे देता येत नाही, त्यासाठी काही चाचणी घेणे गरजेचे आहे, संघटन तपासणे महत्वाचे आहे नुसते आमदार म्हणजे पक्ष नव्हे असे सर्वोच्च न्यायालयच्या निकालात म्हंटल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निकाल देताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

शनिवारी ते भिवंडी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतसाठी पडघा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष गणेश गुळवी, महेंद्र पाटील, सुरेश पवार, देविदास पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेने तब्बल २४ लाख अफीडेव्हिट सादर केले होते.ते विचारात न घेता फक्त आमदार विचारात घेणे चुकीचे आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या टिपणीत म्हंटल आहे .याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विरोध केला आहे असा होतो.हा  निकाल निवडणूक आयोगाचा आहे. सर्वोच्च न्यायालय तो काढून घेणार आणि पक्ष पुन्हा शिवसेनेला बहाल करणार असे सांगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबत निर्णय देताना निवडणूक आयोग सद्सदविवेक बुध्दीचा वापर करेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संविधान बनले असून त्यानुसार पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात . प्रत्येक वेळी पक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची निवड झाली. त्याची माहिती प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाला कळवण्यात आले आहे.अचानक एका दिवशी एखादा माणूस पक्ष माझा आहे असं बोलल्याने पक्ष कधी कोणाचा होऊ शकत नाही.त्यांचे नेते आधीपासूनच सांगत आहेत की पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे राहणार त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती बाबत शंका निर्माण होत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 आम्ही आमची न्यायाची बाजू मांडलेली आहे.काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या पक्ष फुटलेला नाही आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यांमध्ये आहे तेथे अशी कोणती फूट झालेली नाही त्यांनी जे दावे केलेले ते खोडून आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत.मला विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूनेच लागेल ज्या दिवशी फूट झाली त्यादिवशी पक्षाच संविधान आमच्या बाजूने होते.शिवसेने बाबत दिलेल्या निकाला वरून बाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाल सुनावले आहे, त्यामुळे अशी टोकाची भूमीका निवडणूक आयोग घेणार नाही असे वाटते असेही आव्हाड यांनी शेवटी सांगितले.