शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

राष्ट्रवादी बाबत निर्णय घेताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल : आव्हाड

By नितीन पंडित | Updated: September 9, 2023 19:53 IST

शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.

भिवंडी: शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. निवडणूक चिन्ह व पक्ष असे देता येत नाही, त्यासाठी काही चाचणी घेणे गरजेचे आहे, संघटन तपासणे महत्वाचे आहे नुसते आमदार म्हणजे पक्ष नव्हे असे सर्वोच्च न्यायालयच्या निकालात म्हंटल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निकाल देताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

शनिवारी ते भिवंडी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतसाठी पडघा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष गणेश गुळवी, महेंद्र पाटील, सुरेश पवार, देविदास पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेने तब्बल २४ लाख अफीडेव्हिट सादर केले होते.ते विचारात न घेता फक्त आमदार विचारात घेणे चुकीचे आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या टिपणीत म्हंटल आहे .याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विरोध केला आहे असा होतो.हा  निकाल निवडणूक आयोगाचा आहे. सर्वोच्च न्यायालय तो काढून घेणार आणि पक्ष पुन्हा शिवसेनेला बहाल करणार असे सांगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबत निर्णय देताना निवडणूक आयोग सद्सदविवेक बुध्दीचा वापर करेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संविधान बनले असून त्यानुसार पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात . प्रत्येक वेळी पक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची निवड झाली. त्याची माहिती प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाला कळवण्यात आले आहे.अचानक एका दिवशी एखादा माणूस पक्ष माझा आहे असं बोलल्याने पक्ष कधी कोणाचा होऊ शकत नाही.त्यांचे नेते आधीपासूनच सांगत आहेत की पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे राहणार त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती बाबत शंका निर्माण होत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 आम्ही आमची न्यायाची बाजू मांडलेली आहे.काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या पक्ष फुटलेला नाही आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यांमध्ये आहे तेथे अशी कोणती फूट झालेली नाही त्यांनी जे दावे केलेले ते खोडून आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत.मला विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूनेच लागेल ज्या दिवशी फूट झाली त्यादिवशी पक्षाच संविधान आमच्या बाजूने होते.शिवसेने बाबत दिलेल्या निकाला वरून बाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाल सुनावले आहे, त्यामुळे अशी टोकाची भूमीका निवडणूक आयोग घेणार नाही असे वाटते असेही आव्हाड यांनी शेवटी सांगितले.