शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एकनाथ शिंदेंचा टोलमुक्तीस नकार, संजय केळकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:22 IST

आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल ठाकरे सरकारला केला आहे.

ठाणे - मागील कित्येक महिन्यांपासून ठाणेकरांना टोलमुक्ती मिळावी, यासाठी विविध पक्षांनी आंदोलने केली आहेत. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्षच केले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार हे हलक्या वाहनांना टोलमुक्त करा, जास्त आर्थिक परतावा करावा लागत असेल, तर ०४ क्रमांकाच्या वाहनांना पहिल्या टप्प्यात टोलमुक्त करा, या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने नऊ महिन्यांनी मिळाले असून त्यात टोलमुक्तीला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पानेच पुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. बारामतीला काही कोटींचा परतावा देऊन टोलमुक्त केले आहे. ज्या ठाण्यातील नेत्यांनी टोलमुक्तीसाठी आंदोलन केले, तेच आता तिला नकार देत आहेत, हेही ठाणेकरांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून आमचा ०४ टोलमुक्तीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे