शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

हरित ठाणे जिल्ह्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान — एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:42 IST

 काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देभादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयारआतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्णआजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आज केली. त्याप्रसंगी ते बोलत होते     काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोक सहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त बंधारे बांधावयचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.         मुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयार केलेला आहे. बंधाऱ्यांवर शेतकरी आजच्या घडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाऱ्यांच्या जवळच वीटभट्टी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबाचा उदरिनर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्यांच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. तेव्हा पासून आजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेतली जात आहेत. तसेच जनावराना देखील हे पाणी उपयुक्त ठरत आहेत. लोकांनीच बांधलेले हे वनराई बंधारे जिल्ह्यात लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद