शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

हरित ठाणे जिल्ह्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान — एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:42 IST

 काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देभादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयारआतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्णआजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आज केली. त्याप्रसंगी ते बोलत होते     काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोक सहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त बंधारे बांधावयचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.         मुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयार केलेला आहे. बंधाऱ्यांवर शेतकरी आजच्या घडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाऱ्यांच्या जवळच वीटभट्टी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबाचा उदरिनर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्यांच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. तेव्हा पासून आजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेतली जात आहेत. तसेच जनावराना देखील हे पाणी उपयुक्त ठरत आहेत. लोकांनीच बांधलेले हे वनराई बंधारे जिल्ह्यात लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद