शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

रवी पुजारी टोळीतील आठ जणांना अटक

By admin | Updated: October 31, 2015 00:01 IST

उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि पाच काडतुसे हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.प्रवीण पाटील (२५), प्रशांत सपकाळ (२९), रा. दोघेही रा. कुची, जि. सांगली, मिर्चू शर्मा (४६), रा. उल्हासनगर, शफिक शेख (३७), नामदेव आढाव (४०) रा. दोघेही अंबरनाथ तसेच नितीन आघडे, कैलास प्रधान आणि सचिन लोंढे अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत. रवी याने त्याच्या टोळीतील सहकारी सुरेश पुजारी याला ठाणे, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिसरातील राजकीय व्यक्ती आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन करण्यासाठी सांगितले होते. त्यावरून सुरेशने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या भागातील बांधकाम व्यावसायिक सच्चानंद कारिरा याच्याकडे त्याने खंडणीची मागणी केली होती. त्यांनी ती न दिल्याने त्याच्या टोळीतील साथीदारांच्या मदतीने ११ सप्टेंबर २०१५ रोजी कारिरा यांची त्यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयात गोळ्या घालून हत्या केली. या खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि शार्पशूटर नितीन औघडेला पोलिसांनी तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर, रवी आणि सुरेश पुजारी टोळीतील गुन्हेगारांची ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने राज्यात आणि राज्याबाहेर तपास करून या खुनाशी तसेच खंडणीच्या गुन्ह्यांशी संबंधित टोळीला २२ ते ३० आॅक्टोबरदरम्यान अटक केली. त्यांच्यापैकी शफिक याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसे तसेच नामदेव याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि चार काडतुसे जप्त केली.