शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

आठ पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार

By admin | Updated: January 17, 2015 23:20 IST

पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला.

पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे मनोर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरविण्यात आले. या निर्णयाची घोषणा पालकमंत्री, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पत्रकार परिषदेत केली.ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर व ठाणे जिल्ह्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र,याच दरम्यान पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे व मोठ्या गावांची नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका होऊन अल्पावधीतच या नगरपंचायती व नगर परिषदांच्या घोषणा झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका निरर्थक ठरतील व मोठा खर्च वाया जाईल, ही भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली. १९ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे व अखेरच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे या बैठकीत ठरले व अपक्षांचीही या संबंधातील सहमती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीतून माघार घेणार असल्याने २८ जानेवारी रोजी होणारी निवडणूक प्रत्यक्षात होणार नाही, असे आजच्या निर्णयावरून दिसून येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याकरिता तालुका पातळीवर अधिकार त्या त्या पक्षाध्यक्षांना देण्यात आले असून अपक्षांची सहमतीही तालुका पातळीवरून मिळविण्याची जबाबदारी संबंधित पक्षाध्यक्षांनी घ्यायचे ठरले. या बैठकीला पालकमंत्री सवरा, खा. चिंतामण वनगा, आ. आनंद ठाकूर, आ. विष्णू घोडा, आ. पास्कल धनारे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, माजी खा. बळीराम जाधव, दामू शिंगडा, प्रवीण राऊत, मनीष गणोरे, उत्तम पिंपळे, सुरेश जाधव, विकी शुक्ला इ. मान्यवर पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीला माकप आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित नसले तरी या पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून सर्वपक्षीय निर्णयाला आमची सहमती असल्याचे त्यांनी कळविल्याचे पालकमंत्री सवरा यांनी सांगितले. त्यामुळे अपक्षांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.