शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 00:08 IST

बालकामगार प्रथेविरूद्ध जनजागृती अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले.

बालकामगार प्रथेविरूद्ध जनजागृती अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले. महिनाभर चाललेल्या या अभियानात ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही सहायक कामगार आयुक्त कार्यक्षेत्रातील २६९ आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत सात बालकामगार आणि २६ किशोरवयीन कामगार आढळले. प्रत्येक जिल्ह्यात महिन्यातून तीन कारवाया करण्याचे आदेश आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील तिन्ही कार्यलये महिन्याला तीनतीन कारवाया करतात. म्हणजे, एकूण नऊ कारवाया होत असल्याने इतर जिल्ह्यांपेक्षा ठाण्यात तीनपटीने मोहीम राबवणारे ठाणे जिल्हा कामगार उपायुक्त संतोष भोसले यांच्याशी साधलेला संवाद...

बालकामगार कामावर ठेवणे हा गुन्हा आहे, हे माहीत असताना त्यांना का ठेवले जाते?याला प्रामुख्याने परिस्थिती कारणीभूत असते. पण, आता तितका प्रभाव राहिलेला नाही. कायद्यामध्येही सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, धोकादायक आणि बिगरधोकादायक असे प्रकार केल्याने धोकादायकमध्ये बालकामगार आणि बिगरधोकादायकमध्ये किशोरवयीन कामगार मोडतात. दंडाची रक्कमही ५० हजार इतकी केली असून कारावासाची शिक्षा ही सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत वाढवली आहे.

या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी जनजागृती केली जाते. ती नेमकी कशी होते?

राज्य कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार, ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात बालकामगार प्रथा नष्ट करण्याबाबत जनजागृती करताना, कायद्याच्या चौकटीबाहेर गेल्याशिवाय ती होणार नाही. या मोहिमेमध्ये पोस्टर, बॅनर्स, स्टिकर्स, सेल्फी पॉइंट, स्वाक्षरी तसेच विविध व्यापारी, औद्योगिक संघटना यांच्या पातळीवर बैठक घेतल्या. त्याचबरोबर विविध शाळांमधील मुलांच्या प्रभातफेऱ्या काढल्या. ठाणे, कल्याण, मुंब्रा रेल्वेस्थानकांवर जनजागृतीही केली. यावेळी ही प्रथा नष्ट करण्याबाबत वेगवेगळ्या पातळीवर जनजागृती केल्यास बालकामगार प्रथा निश्चितच नष्ट करता येऊ शकेल. समाजानेही यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे.

कोणकोणत्या संस्थांनी सहभाग घेतला होता?

या जनजागृतीत विविध सामाजिक संंघटना, संस्था, व्यापारी असोसिएशन, औद्योगिक संघटना, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आदींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, भिवंडीत सेवाग्री या संस्थेने काम केले.

टॅग्स :Labourकामगारinterviewमुलाखत