शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सण, परीक्षेच्या तोंडावर आठ तास भारनियमनाचे ‘कल्याण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:05 IST

कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे.

कल्याण : कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. कल्याणच्या ग्रामीण भागासाठी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार तेथे सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. दिवसभर जाणवणारी आॅक्टोबर हिट आणि सणासुदीच्या खरेदीच्या काळात लागू झालेल्या या भारनियमनामुळे दिव्यांच्या सणाअगोदर या भागात काळोख पसरला आहे.भारनियमनाच्या विळख्यातून शहरी भागाची तूर्त सुटका झाली असली, तरी त्याचा सर्व भार ग्रामीण भागावर पडला आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार कल्याणच्या ग्रामीण भागात दिवसभरात तब्बल सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार असल्याने तेथील अर्थव्यवस्थाच मोडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे या भागात संतापाचे वातावरण आहे.दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेगवेगळ््या उत्पादनांची, फराळाची तयारी जोमाने सुरू आहे. फराळाच्या पदार्थांसाठी लागणाºया दळणांना त्याचा फटका बसला आहे. सोबतच पाणीपुरवठाही कोलमडला आहे. दूरध्वनी सेवाही सतत खंडित होत आहे. आॅक्टोेबर हिट, त्यात तासनतास वीज नसल्याने सहामाही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. घरात काळोख आणि वर्गातही काळोखाचा सामना ते करत आहेत.सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत असल्याने त्या काळातही महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने त्रासात भर पडत आहे. हे भारनियमन तात्पुरते असल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी त्याचा फटका ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनाला बसला आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन