शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सण, परीक्षेच्या तोंडावर आठ तास भारनियमनाचे ‘कल्याण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:05 IST

कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे.

कल्याण : कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. कल्याणच्या ग्रामीण भागासाठी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार तेथे सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. दिवसभर जाणवणारी आॅक्टोबर हिट आणि सणासुदीच्या खरेदीच्या काळात लागू झालेल्या या भारनियमनामुळे दिव्यांच्या सणाअगोदर या भागात काळोख पसरला आहे.भारनियमनाच्या विळख्यातून शहरी भागाची तूर्त सुटका झाली असली, तरी त्याचा सर्व भार ग्रामीण भागावर पडला आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार कल्याणच्या ग्रामीण भागात दिवसभरात तब्बल सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार असल्याने तेथील अर्थव्यवस्थाच मोडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे या भागात संतापाचे वातावरण आहे.दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेगवेगळ््या उत्पादनांची, फराळाची तयारी जोमाने सुरू आहे. फराळाच्या पदार्थांसाठी लागणाºया दळणांना त्याचा फटका बसला आहे. सोबतच पाणीपुरवठाही कोलमडला आहे. दूरध्वनी सेवाही सतत खंडित होत आहे. आॅक्टोेबर हिट, त्यात तासनतास वीज नसल्याने सहामाही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. घरात काळोख आणि वर्गातही काळोखाचा सामना ते करत आहेत.सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत असल्याने त्या काळातही महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने त्रासात भर पडत आहे. हे भारनियमन तात्पुरते असल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी त्याचा फटका ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनाला बसला आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन