शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

सण, परीक्षेच्या तोंडावर आठ तास भारनियमनाचे ‘कल्याण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:05 IST

कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे.

कल्याण : कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. कल्याणच्या ग्रामीण भागासाठी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार तेथे सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. दिवसभर जाणवणारी आॅक्टोबर हिट आणि सणासुदीच्या खरेदीच्या काळात लागू झालेल्या या भारनियमनामुळे दिव्यांच्या सणाअगोदर या भागात काळोख पसरला आहे.भारनियमनाच्या विळख्यातून शहरी भागाची तूर्त सुटका झाली असली, तरी त्याचा सर्व भार ग्रामीण भागावर पडला आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार कल्याणच्या ग्रामीण भागात दिवसभरात तब्बल सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार असल्याने तेथील अर्थव्यवस्थाच मोडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे या भागात संतापाचे वातावरण आहे.दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेगवेगळ््या उत्पादनांची, फराळाची तयारी जोमाने सुरू आहे. फराळाच्या पदार्थांसाठी लागणाºया दळणांना त्याचा फटका बसला आहे. सोबतच पाणीपुरवठाही कोलमडला आहे. दूरध्वनी सेवाही सतत खंडित होत आहे. आॅक्टोेबर हिट, त्यात तासनतास वीज नसल्याने सहामाही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. घरात काळोख आणि वर्गातही काळोखाचा सामना ते करत आहेत.सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत असल्याने त्या काळातही महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने त्रासात भर पडत आहे. हे भारनियमन तात्पुरते असल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी त्याचा फटका ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनाला बसला आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन