शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भूकंपाने पुन्हा हादरले डहाणू-तलासरीवासी; तीन वर्षांपासून भूकंप-मालिका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:38 IST

डहाणूतील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू, अनेक घरांची पडझड आणि भिंतींना तडे

कासा/तलासरी : पालघर जिल्ह्यातीतल डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे बसत असून यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाने काही घरांची पडझड, तर हजारो घरांच्या भिंतींना आतापर्यंत तडे गेले आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही तालुक्यांतील गावांमधील अनेक घरांचे आतापर्र्यंत नुकसान झाले असून मागील वर्षी दोघांचा भूकंपाने मृत्यू झाला होता.

डहाणूमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा हादरा बसला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत लहान-मोठे भूकंपाचे धक्के बसत असून ४ आणि ५ सप्टेंबर रोजी एकूण चार भूकंपाचे धक्के बसले होते. हे भूकंपाचे धक्के विशेषत: डहाणू आणि तलासरी ग्रामीण आणि किनारपट्टीतील गावांना बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी नागरिकांनी रात्र जागून काढली. ४ सप्टेंबर रोजी बसलेल्या चार धक्क्यांमध्ये ४ रिश्टर तीव्रतेचा सर्वाधिक मोठा धक्का बसला होता. त्या भूकंपाच्या हादऱ्याची तीव्रता धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, आंबोली, धानिवारी, ओसारविरा, महालक्ष्मी, सोनाळे, कासा, चारोटी, पेठ, उर्से आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवली होती.

दरम्यान, भूकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. भूकंप हादऱ्यांनी घरांचे छप्पर, भांडी हलत असल्याने धुंदलवाडी परिसरातील नागरिकांना भीतीने रात्र घराबाहेर काढावी लागत असल्याचे संदीप भसरा व नरेश भोये यांनी सांगितले. भूकंपाची झोपड्यांपेक्षा पक्क्या घरांना तीव्रता अधिक जाणवली. ४ सप्टेंबरच्या भूकंपाच्या हादºयाने डहाणू तालुक्यातील सासवंद गावातील धर्मा डोंबरे या आदिवासी शेतकºयाचे घर कोसळले, तर चिंचले गावातील दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले.

दुहेरी संकटात सापडले नागरिक

च्सुदैवाने या दोन्हीही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर काही गावांतील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. जिल्ह्यात३ नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसत असून आजवर हजारो घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. च्एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे भूकंपाची भीती या दुहेरी संकटात येथील नागरिक सापडले आहेत. त्यांना भीतीने जीवन जगावे लागत आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यात मागील वर्षी भूकंपात घर कोसळून बेंडगाव येथील रिश्या मेघवाले यांचा मृत्यू झाला होता, तर हळदपाडा येथील वैभवी भुयाल या चिमुकलीला जीव गमवावा लागला होता.

टॅग्स :Earthquakeभूकंप