शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

ठाण्यात आता ई-वेस्ट मॅनेजमेंट

By admin | Updated: November 10, 2015 02:14 IST

ओला-सुका कचरा वेगळा करणे, जैविक कचऱ्यावर प्रक्रिया, लाकडापासून इंधन तयार करणे आदी विविध प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत

ठाणे : ओला-सुका कचरा वेगळा करणे, जैविक कचऱ्यावर प्रक्रिया, लाकडापासून इंधन तयार करणे आदी विविध प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत. आता ई-वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभागातून राबविण्यात येणार असून शहरात १०० स्पॉटवर कलेक्शनसाठी डबे ठेवले जाणार आहेत. सुरुवातीला पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर तो राबविला जाणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ६५० मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. परंतु, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेकडे आजही डम्पिंगची व्यवस्था नाही. परंतु, आता स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने शहरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, आता पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत ई-वेस्ट मॅनेजमेंट अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवणार असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. खाजगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून येणाऱ्या संस्थेला शहरातील मुख्य १०० ठिकाणे दिली जाणार आहेत. त्या ठिकाणी १० फुटांपर्यंतचे डबे ठेवले जाणार असून ई-वेस्ट या डब्यात टाकावे, असे त्यावर नमूद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)ई-वेस्ट विषयाची माहिती सर्वसामान्यांना करून देण्यासाठी पहिल्या वर्षी जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी साधारणपणे किती कलेक्शन होते, याचा अंदाज बांधला जाणार आहे. त्यानुसार, पालिकेला या प्रकल्पापासून उत्पन्नाचा किती हिस्सा मिळणार, हे निश्चित होईल.वार्षिक ३६ लाख किलो जमा : केंद्राकडून झालेल्या सर्व्हेत एक व्यक्ती वर्षाला २ ते अडीच किलो ई-वेस्टची निर्मिती करते. त्यानुसार, ठाणे शहराची लोकसंख्या आजघडीला १८ लाखांच्या आसपास असल्याने महापालिका हद्दीत वार्षिक सुमारे ३६ लाख किलो ई-वेस्ट जमा होईल, असा अंदाज बांधला जात आहे.