शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माथेरानच्या रस्त्यावर धावणार ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 08:43 IST

चाचणी शांततेत; नागरिकांकडून स्वागत : शालेय विद्यार्थी, ज्येष्ठांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी माथेरानमध्ये अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि स्थानिकांच्या साथीने शांततेत ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यावेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. 

यावेळी नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे, चंद्रकांत माने, आरटीओ पनवेल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय कराळे, संजय पाटील, डीवायएसपी कर्जत, पीसीबी सागर किल्लेदार, आर. एस. कामत, प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि ई रिक्षाचे याचिकाकर्ते सुनील शिंदे आणि नागरिक मोठ्या संख्येने ई रिक्षाच्या स्वागतासाठी दस्तुरी नाक्यावर उपस्थित होते.चाचणीसाठी एकूण पाच कंपन्यांच्या ई रिक्षा दाखल झाल्या होत्या. सध्यातरी तीन महिने या रिक्षांचे परीक्षण घेण्यात आल्यानंतर तसा अभिप्राय संनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासक भणगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. रिक्षांमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. आम्ही या चाचणीच्या सुरक्षेसाठी आलो असून, चढउतार असणाऱ्या ठिकाणी रिक्षा कशा प्रकारे तग धरू शकते, याची सविस्तर माहिती वरिष्ठांना लवकरच देणार आहोत, असे माने यांनी सांगितले.

कामगार, रुग्णांसाठी सेवा फायदेशीरसर्व प्रक्रियेसाठी १० वर्षांपासून अविरतपणे पाठपुरावा करून रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार आणि अन्य सदस्यांच्या सोबतीने यशस्वीरीत्या या ई रिक्षाच्या चाचणीपर्यंत मजल मारणारे याचिकाकर्ते सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. या रिक्षांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळींना घेता येणार आहे. दूरवर राहणारे बंगल्यांचे माळी, कामगारांना तसेच रुग्णांना ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाMatheranमाथेरान