शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कर्जतमध्ये कचरा उचलण्यासाठी ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:40 IST

कर्जत शहर गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेबाबत देशात आघाडीवर असलेल्या शहरात गणले जाते आहे

कर्जत: कर्जत शहर गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेबाबत देशात आघाडीवर असलेल्या शहरात गणले जाते आहे. पालिकेने कचरा उचलण्यासाठी स्वत:ची वाहने खरेदी केल्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत गल्लीबोळात कचरा उचलण्यासाठी ई-वाहने आणून ती समस्या सोडविली आहे. दरम्यान,अशा प्रकारे कचरा उचलण्यासाठी ई-वाहने वापरणारी कर्जत ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.कचरा निर्मूलनाचे काम करून जगाचे लक्ष वेधणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कर्जत शहरात कचरा समस्या कायमची सोडविण्याचा निश्चय केला आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाड्या कार्यरत असताना देखील तीवाहने जाऊ शकत नसलेल्या गल्लीबोळात कचरा तसाच पडून राहत होता. ही समस्या नगरपालिका अध्यक्षा रजनी गायकवाड,गटनेते राजेश लाड यांनी कशी सोडविता येईल याबाबत चर्चा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याशी केली. त्यानंतर कोकरे यांनी अनपेक्षित असे काम त्याबाबत करताना ई वाहने साकारली आणि कर्जतच्या गल्लीबोळात असणारा कचरा उचलला जाऊ लागला. ई वाहने यांच्या इंधनावर खर्च देखील करावा लागत नसल्याने पालिका प्रशासनाच्या खर्चात देखील कपात झाली आहे.या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, उपनगराध्यक्षउमेश गायकवाड आदी उपस्थित होते.ई-रिक्षा बहुपयोगी आहे, शहरातल्या अरुंद गल्ल्यांमध्ये वेगाने काम करते. भविष्यात अशा ई-रिक्षा वाढवण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे. या ई-कचरागाडीमुळे ग्रीन कर्जतचा नारा बुलंद होणार आहे.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNavi Mumbaiनवी मुंबई