शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:55 IST

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.

डोंबिवली - गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने या कामी डोंबिवलीत निर्मल युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक, १२ टन घनकचरा असे वर्गीकरण करून जलस्त्रोतात जाण्यापासून वाचवण्यात आले व जलप्रदूषण टाळत निर्माल्य गणेश मंदिर संस्थानाच्या गांडूळखत निर्मितीसाठी सुपूर्त करण्यात आले.

 दीड ते अकरा दिवसांच्या गणेशोत्सव काळात या जेथे गणेश विसर्जन करण्यात आले त्या ठिकाणी विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन करण्यात आले. ह्या वर्षी ही निर्मल युथ फाऊंडेशन , डोंबिवली संस्थेचे स्वयंसेवक निर्मल्य संकलनाचे कार्य  पूर्वेकडे आयरे गाव तलाव, पश्चिममेला  कोपर तलाव,जुनी डोंबिवली गणेश घाट, रेतीबंदर गणेश घाट, देवीचा पाडा, कुंभारखन पाडा येथे विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे सुमारे 350 हुन अधिक स्वयंसेवक भर पावसात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

या कार्यास गतवर्षीपासून संस्थेसोबत साऊथ इंडियन आसोसिएशन व प्रगति या महाविद्यालयाच्या एन. एस.एस विभागाचे स्वयंसेवक तसेच जी. आर. पाटिल महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, घनकचरा व्यवस्थापन विभाग क.डो.म.पा. डोंबिवलीचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, पवन पाटिल, नगरसेेेक दीपेेेश म्हात्रे, प्रकाश भोईर,  विकास म्हात्रे आणि संगिता पाटील यांचे सहकार्य मिळाले. पुढच्या वर्षीही विसर्जनाच्या वेळीही हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

नाले, समुद्र इत्यादी जलाशयात निर्माल्य तसेच प्लास्टिक कचरा टाकल्यास प्रदूषण वाढते तसेच जलाशयातील जलचर प्राण्यांच्या शरीरात हा कचरा अडकू शकतो शिवाय त्यांच्या पर्यावरणीय अधिवासासही ह्या मुळे धोका निर्माण होतो आणि जैवविविधता  नष्ट होऊ लागते आणि सृष्टीचे चैतन्य हरवते. त्यामुळे संस्थेने नागरिकांना आवाहन केले होते की आपल्या घरच्या अथवा मंडळाचा गणपती विसर्जित करताना निर्माल्य संकलनासाठी स्वतःहून जबाबदारीने निर्मल युथ फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे अशा पद्धतीने जनजागृती करण्यात आली होती.

त्यानुसार या संस्थेद्वारे आयोजित व राबवण्यात येणाऱ्या आगळ्या वेगळ्या निर्माल्य संकलनाच्या योजनेमुळे डोंबिवली शहराचे नागरीक सजग होत आहेत व पर्यावरणपूरक सण साजरे होण्यास चालना मिळत आहे तसेच त्या त्या विभागात विकासाची गती वाढून स्वच्छतेचा व प्रदूषण टाळण्याचा संदेश पोहचल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवdombivaliडोंबिवली