शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:55 IST

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.

डोंबिवली - गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने या कामी डोंबिवलीत निर्मल युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक, १२ टन घनकचरा असे वर्गीकरण करून जलस्त्रोतात जाण्यापासून वाचवण्यात आले व जलप्रदूषण टाळत निर्माल्य गणेश मंदिर संस्थानाच्या गांडूळखत निर्मितीसाठी सुपूर्त करण्यात आले.

 दीड ते अकरा दिवसांच्या गणेशोत्सव काळात या जेथे गणेश विसर्जन करण्यात आले त्या ठिकाणी विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन करण्यात आले. ह्या वर्षी ही निर्मल युथ फाऊंडेशन , डोंबिवली संस्थेचे स्वयंसेवक निर्मल्य संकलनाचे कार्य  पूर्वेकडे आयरे गाव तलाव, पश्चिममेला  कोपर तलाव,जुनी डोंबिवली गणेश घाट, रेतीबंदर गणेश घाट, देवीचा पाडा, कुंभारखन पाडा येथे विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे सुमारे 350 हुन अधिक स्वयंसेवक भर पावसात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

या कार्यास गतवर्षीपासून संस्थेसोबत साऊथ इंडियन आसोसिएशन व प्रगति या महाविद्यालयाच्या एन. एस.एस विभागाचे स्वयंसेवक तसेच जी. आर. पाटिल महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, घनकचरा व्यवस्थापन विभाग क.डो.म.पा. डोंबिवलीचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, पवन पाटिल, नगरसेेेक दीपेेेश म्हात्रे, प्रकाश भोईर,  विकास म्हात्रे आणि संगिता पाटील यांचे सहकार्य मिळाले. पुढच्या वर्षीही विसर्जनाच्या वेळीही हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

नाले, समुद्र इत्यादी जलाशयात निर्माल्य तसेच प्लास्टिक कचरा टाकल्यास प्रदूषण वाढते तसेच जलाशयातील जलचर प्राण्यांच्या शरीरात हा कचरा अडकू शकतो शिवाय त्यांच्या पर्यावरणीय अधिवासासही ह्या मुळे धोका निर्माण होतो आणि जैवविविधता  नष्ट होऊ लागते आणि सृष्टीचे चैतन्य हरवते. त्यामुळे संस्थेने नागरिकांना आवाहन केले होते की आपल्या घरच्या अथवा मंडळाचा गणपती विसर्जित करताना निर्माल्य संकलनासाठी स्वतःहून जबाबदारीने निर्मल युथ फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे अशा पद्धतीने जनजागृती करण्यात आली होती.

त्यानुसार या संस्थेद्वारे आयोजित व राबवण्यात येणाऱ्या आगळ्या वेगळ्या निर्माल्य संकलनाच्या योजनेमुळे डोंबिवली शहराचे नागरीक सजग होत आहेत व पर्यावरणपूरक सण साजरे होण्यास चालना मिळत आहे तसेच त्या त्या विभागात विकासाची गती वाढून स्वच्छतेचा व प्रदूषण टाळण्याचा संदेश पोहचल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवdombivaliडोंबिवली