शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात प्रसूती दरम्यान मायलेकीचा मुत्यू, डॉ कदम व खाडे यांच्यावर कार्यमुक्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:55 IST

मध्यवर्ती रूग्णालयात शुक्रवारी प्रसूती दरम्यान महिला व बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

उल्हासनगर - मध्यवर्ती रूग्णालयात शुक्रवारी प्रसूती दरम्यान महिला व बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले. आरोग्य उपसंचालक डॉ रत्ना रावखंडे यांनी घडलेल्या सर्व प्रकारची चौकशी करण्याचे आदेश देवून डॉ सुहास कदम व डॉ अर्जना खाडे यांना कार्यमुक्त केले.नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह रूग्णालया समोर ठेवून आंदोलन केले.

उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयात आंबिवली गावात राहणारी आरती चौहाण हिला प्रस्तूतीसाठी नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता भरती केले. महिलेला उपचारासाठी येथे का आणले?. तुम्हांला कल्याण येथील शासकिय दवाखाना जवळ आहे. आदी अनेक प्रश्नाची सरबती करून महिलेवर उपचार सुरू केला. यावेळी डॉक्टर व नातेवाईकांत तू तू में में झाली. महिलेची तब्येत त्यावेळी ठणठणीत व चांगली असून नैसर्गिेक प्रसुतीसाठी काही काळ थांबण्याचा सल्ला नातेवाईकाना डॉक्टरांनी दिला. सकाळी ९ वाजता नातेवाईकांनी महिलेला चहा देवून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

महिलेच्या प्रसूतीला वेळ होत असल्याने, नातेवाईकांनी पुढाकार घेत दुपारी नैसर्गिक प्रसुती होत नसेलतर सिजर करा. असा सल्ला डॉ सुहास कदम, डॉ अर्चना खाडे यांना दिला. मात्र त्यांनी सल्ला ऐकला नाही. थेट सायकांळचे साडे चार वाजता महिलेचे सिजर केले. सिजर मध्ये बाळाचा मुत्यू झाला असून महिलेची तब्येत ठणठणीत व चांगली असल्याचे नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले. मात्र महिलेला भेटण्यास मनाई केली. त्यामुळे नातेवाईकांचा मनात सशंय बळावला. त्यांनी महिलेला भेटण्याची इच्छा वांरवांर डॉक्टरकडे व्यक्त केली.

अखेर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सायकांळचे ७ वाजता मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून महिलेला डॉक्टर भेटू देत नाही. असी तक्रार केली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थाची भुमिका वठवित डॉक्टरांची चर्चा केली. काही काळ थांबा महिलेची तब्येत ठणठणीत असल्याचे पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र अचानक रात्री ९ वाजता महिलेची तब्येत अत्यंत खराब असून मुंबईला घेवून जावे लागेल. असे घाईघाईत सांगण्यात आले. याप्रकाराने नातेवाईकाच्या पाया खालची वाळु सरकली. रूग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापुरकर यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती आरोग्य संचालय डॉ रत्ना रावखंडे यांना दिली. तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांना खाजगी शववाहिनी उपलब्ध करून दिली.

मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी रात्री २ वाजता महिलेचा मृतदेह मुंबई घेवून जे जे रूग्णालयात गाठले. शनिवारी सकाळी ६ वाजता रूग्णालयात पोहचल्यानंतर सकाळी ९ वाजता इन कॅमेरा शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह पुन्हा मध्यवर्ती रूग्णालयात आणून डॉक्टरावरील कारवाईसाठी आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य संचालक डॉ रत्ना रावखंडे यांनी डॉ सुहास कदम व डॉ अंजली खाडे यांना रूग्णालयातून कार्यमुक्त करून चौकशीचे आदेश दिले. तसेच महिलेच्या नातेवाईकांना विशेष बाबत म्हणून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह व लहान बाळ घेवून निघुन गेले. असी माहिती मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक नंदापुरकर यांनी दिली. याप्रकाराने संपूर्ण रूग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिस तैनात केले होते.

डॉ सुहास कदम यांच्या चौकशीचे आदेशमध्यवर्ती रूग्णालयातील स्त्रीरोगतंज्ञ डॉ सुहास कदम व डॉ अर्जना खाडे यांच्यासह इतर कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे दोन जीवाचा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकासह नागरिकांनी केला. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई विभागाच्या आरोग्य संचालक डॉ रत्ना राखखंडे यांनी ठाणे रूग्णालयाचे जिल्हाशल्य जिकित्सक डॉ बी सी कॅम्पी पाटील यांना सदर घटना व डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच डॉ खाडे व कदम यांना रूग्णालयातून कार्यमुक्त केले. 

खुनाचा गुन्हा दाखल करामृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉ सुहास कदम व डॉ अर्चना खांडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मध्यवर्ती रूग्णालयात तसे निवेदन व तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसूतीसाठी हसत-खेळत आलेल्या महिलेसह तीच्या बाळाचा डॉक्टर व संबधीत कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.