शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्के आहे. ही समाधानाची बाब असली, तरी सध्या मृतांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. १ ते ११ मेपर्यंत १५० जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, मृत्युदरही वाढून १.२४ टक्के झाला आहे.

आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३७ हजार ६२० रुग्ण उपचाराअंती बरे झाले झाले. मात्र, १७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मे महिन्यात मागील ११ दिवसांत सहा हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले, तर १२ हजार ८३४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्क्यांवर गेले आहे. एप्रिलच्या अखेरीस हे प्रमाण ८६.४५ टक्के, तर रुग्णदुपटीचा कालावधी ४३ पर्यंत घसरला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो ५२ दिवसांवर गेला होता. मात्र, सध्या रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होते, परंतु अखेरच्या आठवड्यात दररोज १० मृत्यू नोंदविले गेले. मे महिन्यापासून यात अधिकच भर पडली असून, ११ मे रोजी एका दिवसातील सर्वाधिक २० जणांचा मृत्यू झाला.

---------------------

मृत्युदरात चढ-उतार

- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मृत्युदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्के व त्यानंतर तो १.१९ टक्के इतका कमी झाला होता, परंतु सध्या मृत्यू वाढल्याने मृत्युदर पुन्हा १.२४ टक्के झाला आहे.

- मात्र, मृतांची सध्याची दैनंदिन संख्या ही २४ तासांतील नाही, असे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे, तर सुरुवातीपासूनच मनपा हद्दीतील मृत्युदर हा कमी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

---------------------