शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्के आहे. ही समाधानाची बाब असली, तरी सध्या मृतांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. १ ते ११ मेपर्यंत १५० जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, मृत्युदरही वाढून १.२४ टक्के झाला आहे.

आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३७ हजार ६२० रुग्ण उपचाराअंती बरे झाले झाले. मात्र, १७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मे महिन्यात मागील ११ दिवसांत सहा हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले, तर १२ हजार ८३४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्क्यांवर गेले आहे. एप्रिलच्या अखेरीस हे प्रमाण ८६.४५ टक्के, तर रुग्णदुपटीचा कालावधी ४३ पर्यंत घसरला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो ५२ दिवसांवर गेला होता. मात्र, सध्या रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होते, परंतु अखेरच्या आठवड्यात दररोज १० मृत्यू नोंदविले गेले. मे महिन्यापासून यात अधिकच भर पडली असून, ११ मे रोजी एका दिवसातील सर्वाधिक २० जणांचा मृत्यू झाला.

---------------------

मृत्युदरात चढ-उतार

- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मृत्युदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्के व त्यानंतर तो १.१९ टक्के इतका कमी झाला होता, परंतु सध्या मृत्यू वाढल्याने मृत्युदर पुन्हा १.२४ टक्के झाला आहे.

- मात्र, मृतांची सध्याची दैनंदिन संख्या ही २४ तासांतील नाही, असे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे, तर सुरुवातीपासूनच मनपा हद्दीतील मृत्युदर हा कमी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

---------------------