शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

डम्पिंगप्रश्नी रहिवासी आक्रमक, महासभेत देणार धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:07 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हटवण्यासंदर्भात अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसताना त्याला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हटवण्यासंदर्भात अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसताना त्याला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. शहरात नुकत्याच झालेल्या आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्यापासूनही हा ज्वलंत विषय लपवून ठेवण्यात आला. मुख्यमंत्री महोत्सवाला उपस्थित असताना दुसरीकडे डम्पिंगला आग लागली होती. ही वस्तुस्थिती असताना लोकप्रतिनिधींनी याला बगल दिल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. त्यामुळे केडीएमसीच्या महासभेत धडक देत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.डम्पिंग हटवण्यासंदर्भात पावसाळ्यात रहिवाशांनी विशेष मोहीम हाती घेतली. दरम्यानच्या कालावधीत डम्पिंगचा धूर, उग्र वास कमी झाला. केडीएमसीकडून डम्पिंग हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या मोहिमेला अर्धविराम देण्यात आला होता. पण, कालांतराने केडीएमसीची कृती थंड पडली. त्यात आगीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे पुन्हा डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मुख्यमंत्री नुकतेच कल्याण दौऱ्यावर आले होते. शहरातील फडके मैदानावरील आगरी-कोळी महोत्सवालाही त्यांनी भेट दिली होती. परंतु, ते जेव्हा कल्याणमध्ये आले, तेव्हाही डम्पिंगला आग लागलेली होती. मात्र, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत ही गोष्ट जाऊच नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आटोकाट प्रयत्न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. डम्पिंगचे दिवे बंद केले आणि तत्काळ फवारणी करून आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री गेल्यानंतर आगीचे सत्र सुरूच राहिले असून धुराने श्वास घुसमटणे नित्याचीच बाब झाल्याकडे स्थानिक रहिवाशांनी लक्ष वेधले आहे.फडणवीस यांनी मोहने येथील कार्यक्रमात तेथील बंद असलेल्या एनआरसी कंपनी तसेच रिंगरूट प्रकल्पाबाबत भाष्य केले. त्यामुळे वाहतूककोंडी तसेच वर्षानुवर्षे त्रासदायक होणाºया डम्पिंगच्या प्रश्नाबाबत काहीतरी बोलतील आणि आम्हाला काहीतरी दिलासा मिळेल, अशी आशा रहिवाशांना होती. परंतु, त्यांची घोर निराशा झाली. डम्पिंगचा गंभीर विषय फडणवीस यांच्याकडे न काढणाºया लोकप्रतिनिधींबाबत कमालीचा रोष निर्माण झाला आहे. याबाबत त्यांना जाब विचारण्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. गुरुवारी फडके मैदान परिसरात रहिवासी सीमा दिवाथे, स्मिता जोशी व यशश्री जहागीरदार यांच्या पुढाकाराने विशेष बैठक झाली. यामध्ये प्रारंभी फडणवीस यांनी केलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.।तेरी भी चूप मेरी भी चूप, स्थानिकांना कोणीच वाली नाहीज्या महोत्सवाला मुख्यमंत्री उपस्थित होते, त्याला सर्वच पक्षांचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी उपस्थित होते. मात्र, एकालाही या ज्वलंत प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधावे, असे वाटले नाही. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी परिस्थिती असून स्थानिकांना कोणीच वाली उरला नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी लोकप्रतिनिधींना जाब विचारायचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला परिसरातील इमारतींमधील रहिवासी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, महेश बनकर हे देखील आवर्जून उपस्थित होते.