शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दिव्यातील अपयश झाकण्यासाठी १४ गावातील भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:25 IST

मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप.

ठळक मुद्देमनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

कल्याण-दिव्यातील कचरा डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे ही मागणी अनेक वर्षापासून आहे. मात्र हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी ते १४ गावातील भंडार्ली गावानजीक उभारण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. दिव्यातील अपयश झाकण्यासाठी भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड केले जात असल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कचऱ्याचे आंदोलन अधिक आक्रमक होईल. भंडार्ली गावात डंपिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कच:यात टाकू. नागरीकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेस करण्याची धमकी दाखवून डंपिंग लादले जात असेल तर आमच्यावर केसस झाल्या तरी चालतील मात्र डंपिंग होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा मनसे आमदार पाटील यांनी दिला.

ठाणे महापालिका हद्दीतील कचरा १४ गावातील भंडार्ली गावात टाकण्यासाठी चार हेक्टर जागा भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव संघर्ष समितीने विरोध केला आहे. १४ गावात आधीच प्रदूषणाची समस्या आहे. ठाणे महापालिका जबरदस्तीने शहरातील कचरा गावातील नागरीकांच्या माथी मारुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याची बाब संघर्ष समितीने नमूद केली आहे. बुधवारी १४ गाव संघर्ष समिती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार पाटील हे उपस्थित होते. आमदारांनी डंपिंगला विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून राजकारण केले जात आहे. यावेळी आमदार पाटील यांनी भंगार माफियांनाही दम भरला आहे. सत्ताधाऱ्यांना कचऱ्यातून निवडणूकीचा फंड जमा करायचा आहे का असा सवालही उपस्थित केला आहे.

१०० एकर जागा महापालिकेनं घेतलीमलंग गड हा सह्याद्रीच्या फूटहिल्स समजला जातो. या फूटहिल्सपासूनच सह्याद्रीच्या पर्वत रांगांची सुरुवात होते. मलंग गडाच्या पायथ्याशी करवले गावात मुंबई महापालिकेने १०० एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी डंपिंग ग्राऊंड कचरा प्रकल्प तयार केला जाणार आहे. करवले गावा शेजारी असलेल्या उसाटणे गावानजीक १० हेक्टर जागेवर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रयत्नशील आहे. करवले आणि उसाटणे गावातील दोन्ही डंपिंग ग्राऊंडला विरोध असताना आत्ता ठाणे महापालिका हद्दीतील कचरा भंडार्ली गावातील नागरीकांच्या माथी मारुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. एकूण निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावात डंपिंग तयार करुन गावे बकाल आणि प्रदूषित करण्याचा घाट घातला जात असल्याने त्याला विरोध केला जाईल अशी या गावातील नागरीकांची भूमिका आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलdumpingकचरा