शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वन विभागाच्या जागेवर डम्पिंग

By admin | Updated: April 9, 2016 03:39 IST

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे.

ठाणे : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे. पर्यावरण विभागाने यास मान्यता दिली असून या ठिकाणी ४०० मे. टन ओल्या कचऱ्यावर अ‍ॅरोबिक कम्पोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्यावर गेली असतानादेखील आजही ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळाले नव्हते. शहरात रोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून सध्या त्याची विल्हेवाट दिव्यातील क्षेपणभूमीवर लावली जात आहे. परंतु, डायघरचा प्रश्न स्थानिकांच्या विरोधामुळे आणि तळोजा येथील सामायिक भरावभूमीचा प्रस्ताव दरामध्ये आलेल्या तफावतीमुळे रखडल्याने पालिकेला अद्यापही शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावता आलेली नाही. सध्या दिवा-खर्डी येथील जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. परंतु, येथील रहिवाशांचाही विरोध झाल्याने आणि उच्च न्यायालयानेदेखील डम्पिंगच्या मुद्यावरुन पालिकेची कानउघाडणी केल्याने अखेर पालिकेने हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. शीळ येथील वन विभागाची जागा मिळावी म्हणून पालिकेने वन विभागाशी वारंवार पत्रव्यवहारही केला होता. परंतु, त्यावर अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्राधिकरणाने ही जागा पालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे.मौजे शीळ येथे वन खात्याच्या जमिनीवर अंदाजे अडीच एकर जागेत बंद पडलेली खदाण आहे. त्या ठिकाणी घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाणार आहे. या जागेमध्ये शहरामध्ये संकलित होणाऱ्या जवळपास ४०० टन ओल्या कचऱ्यावर अ‍ॅरोबिक कम्पोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याशिवाय, दिवा येथील उघड्यावर असलेले डम्पिंगदेखील आता बंद स्वरूपात कार्यरत केले जाणार आहे.