शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग दोन वर्षांनंतर होणार बंद; केडीएमसी आयुक्तांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:52 IST

नगरविकास खात्याला पाठवला अहवाल

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची डोकेदुखी ठरलेले आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आणखीन दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचा अहवाल आयुक्त गोविंद बोडके यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना पाठवला आहे. महापालिकेच्या या अहवालामुळे कल्याणच्या नागरिकांना डम्पिंगच्या त्रासातून सुटका होण्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.आधारवाडी डम्पिंग ग्राउंड व घनकचरा प्रकल्पांसंदर्भात ८ जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उंबर्डे घनकचरा प्रकल्प १५ सप्टेंबरपर्यंत व बारावे प्रकल्प १५ जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा, अधिकारीवर्गाचे पगार आणि महापालिकेस दिले जाणारे सरकारी अनुदान रोखण्याचा इशारा दिला होता. या आदेशानंतरही महापालिका प्रशासनाकडून डेडलाइन पाळली गेली नाही.यासंदर्भात नगरविकास खात्याकडून विचारणा केली असता आयुक्तांनी नगरविकास खात्याला एक अहवाल पाठवला आहे. त्यात उंबर्डे घनकचरा प्रकल्पाचे काम दिलेल्या डेडलाइनमध्ये पूर्ण होणार होते. मात्र, सुरू असलेल्या कामाला अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे विलंब झाला. पावसाचा जोर कमी झाल्याने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.प्रकल्पाचे सध्याच्या स्थितीला ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करून प्रकल्पात कचरा प्रक्रिया ३१ आॅक्टोबरपासून सुरू केली जाईल, असे कळवले आहे. उंबर्डे प्रकल्प आॅक्टोबरपासून सुरू झाल्यावर ६५० मे.ट. कचऱ्यापैकी ३५० मे.ट. कचºयावर प्रक्रिया होईल.देवधर समितीचा अहवाल येताच कामाला होईल सुरुवातआधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. मात्र, त्यापूर्वी उंबर्डे व बारावे प्रकल्प जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करता येत नाही. बारावे कचरा प्रकल्पाबाबत हरित लवादाकडे याचिका प्रलंबित आहे. लवादाने हे प्रकरण सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविले आहे. नगरविकास खात्याने देवधर समितीची नियुक्ती केली आहे. प्रकल्पास नागरिकांचा विरोध आहे. देवधर समितीचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त होताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करता येईल.अहवाल प्राप्त झाल्यानंतर सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम करणे शक्य होईल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्याने पावसाळ्यानंतर पोलीस बंदोबस्तात प्रकल्पाचे काम केले जाईल. ही सगळी प्रक्रिया पाहता, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.याशिवाय, मांडा येथील कचरा प्रकल्पाचे काम महापालिकेने राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीकडे सादर केले आहे. समितीने पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल मागितला होता. सुधारित अहवालही महापालिकेने १९ सप्टेंबर २०१९ रोजी सादर केला आहे. प्रकल्पास पर्यावरण नाहरकत दाखला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मांडा येथील प्रकल्पाचे घोडे अडलेले आहे.

टॅग्स :dumpingकचरा