शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

अपंगांच्या स्टॉलवर पालिकेची गदा

By admin | Updated: January 25, 2016 01:18 IST

वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न चालवल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. वसई पश्चिमेतील अभिलाषा रोडवर असलेल्या २२ स्टॉलवर पालिकेने कारवाई केली. विशेष म्हणजे या २२ स्टॉलमध्ये पाच अपंगांचे स्टॉल असून या स्टॉलना तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने परवानगी दिलेली आहे. अपंगांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २००८ मध्ये तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने पाच अपंगांना वसई पश्चिमेतील साईनगर स्थित अभिलाषा रोडच्या बाजूला स्टॉलची परवानगी दिली होती. तर, अन्य १७ स्टॉलधारकांनीही परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केले होते. या ठिकाणी एकूण २२ स्टॉलच्या माध्यमातून अपंग व आर्थिक दुर्बल घटकांतील लोक किरकोळ सामानविक्री करून आपला उदरनिर्वाह करायचे. परंतु, एक महिन्यापूर्वी पालिकेच्या ‘एच’ प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुरेश पवार यांनी स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून सर्व स्टॉलधारकांना स्टॉल हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर, परवानाधारक स्टॉलधारकांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना वसई-नालासोपारा लिंक रोड किंवा १०० फुटी रोडवर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, या आश्वासनांची पूर्तता न करताच पालिकेने स्टॉल हटवण्याची कारवाई सुरू केल्याने स्टॉलधारकांनी त्यास तीव्र विरोध केला. (प्रतिनिधी)पालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत स्टॉल हटवणार नाही, अशी भूमिका अपंग स्टॉलधारक देवराज कपूर, ब्रिजेशकुमार चौबे, चंपकभाई शहा, रोहित रामदास आसर, बलजितसिंग गुलाटी व बाबुलाल चव्हाण यांनी घेतली आहे. अन्य स्टॉलधारकही मागील सात ते आठ वर्षांपासून पालिकेची दैनंदिन पावती फाडत असल्याचे सांगून पालिकेने आमचा रोजगार हिरावून घेतल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवणार असल्याचे सांगितले. या स्टॉलवर अनेकांची कुटुंबे अवलंबून आहेत, त्यामुळे पालिकेने या गरिबांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला जनरल सेक्रेटरी सय्यद नजमा अस्लम व सय्यद मोहम्मद अस्लम यांनी सांगितले.वसईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध फेरीवाले बस्तान मांडून बसले आहेत. मुख्य रस्त्यांवर धनाढ्य गाड्या विक्रेत्यांकडून गाड्या उभ्या ठेवण्यासाठी रस्त्याचा वापर केला जातो. असे असतानाही पालिका त्याकडे काणाडोळा करून गरिबांच्या रोजीरोटीवर गदा आणत असल्याचा आरोप अस्लम यांनी केला आहे.