शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 05:52 IST

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात.

अंबरनाथ: अंबरनाथच्या लोकनगरी पुलापासून ते थेट स्वामी समर्थ चौकापर्यंत जाणारा अंबरनाथचा पहिला बाह्यवळण रस्ता पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच येथून वाहतूक सुरू झाल्याने मातीच्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे आसपासच्या निवासी संकुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधी रस्ता पूर्ण करा, मगच वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी आता रहिवाशांकडून होत आहे.

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात. कामगारांसाठी बस कंपन्यांमार्फत दिल्या आहेत. यांची वाहतूक मुख्य शहरातून होत असल्याने वाहनांमुळे वडवली ते आनंदनगरपर्यंत मोठी वाहतूककोंडी होते. त्यात वडवली ते लोकनगरीच्या या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या बस जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येत आहे.लोकनगरी पूल ते गोविंद पूलमार्गे स्वामी समर्थ चौकापर्यंतच्या पहिल्या बाह्यवळण रस्त्याची उभारणी केली जात आहे. याच्या आरेखनबदलाला एमएमआरडीएनेही मंजुरी दिल्याने त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने आसपासचे दुकानदार, नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी येथे सुरुवातीला मातीची भर घालण्यात आली. मात्र, अचानक मोठे ट्रक, बस अशा अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हीच धूळ शेजारी असलेल्या रहिवासी संकुलांत जात आहे. यासाठी आता नागरिकांनी पालिका प्रशासनाला येथील वाहतूक थांबवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असल्याची माहिती येथील दुकानदार संतोष महाडेश्वर यांनी दिली आहे. या धुळीमुळे इतर छोटी वाहने या रस्त्यावरून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी खुला करू नये, अशी मागणी आता होत आहे.

लोकनगरी ते स्वामी समर्थ चौक या रस्त्याचे सध्या मजबुतीकरण केले आहे. याच रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. मात्र, शिवाजी चौक ते वडवली या रस्त्याचे काम सुरू असल्याने जड वाहतूक या कच्च्या रस्त्यावरून सुरू केली आहे. त्याचा फटका आता स्थानिकांना बसत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना किमान त्या ठिकाणी धूळ उडणार नाही, अशी व्यवस्था करण्याची गरज होती. 

टॅग्स :thaneठाणे