शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अंबरनाथमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 05:52 IST

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात.

अंबरनाथ: अंबरनाथच्या लोकनगरी पुलापासून ते थेट स्वामी समर्थ चौकापर्यंत जाणारा अंबरनाथचा पहिला बाह्यवळण रस्ता पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच येथून वाहतूक सुरू झाल्याने मातीच्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे आसपासच्या निवासी संकुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधी रस्ता पूर्ण करा, मगच वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी आता रहिवाशांकडून होत आहे.

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात. कामगारांसाठी बस कंपन्यांमार्फत दिल्या आहेत. यांची वाहतूक मुख्य शहरातून होत असल्याने वाहनांमुळे वडवली ते आनंदनगरपर्यंत मोठी वाहतूककोंडी होते. त्यात वडवली ते लोकनगरीच्या या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या बस जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येत आहे.लोकनगरी पूल ते गोविंद पूलमार्गे स्वामी समर्थ चौकापर्यंतच्या पहिल्या बाह्यवळण रस्त्याची उभारणी केली जात आहे. याच्या आरेखनबदलाला एमएमआरडीएनेही मंजुरी दिल्याने त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने आसपासचे दुकानदार, नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी येथे सुरुवातीला मातीची भर घालण्यात आली. मात्र, अचानक मोठे ट्रक, बस अशा अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हीच धूळ शेजारी असलेल्या रहिवासी संकुलांत जात आहे. यासाठी आता नागरिकांनी पालिका प्रशासनाला येथील वाहतूक थांबवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असल्याची माहिती येथील दुकानदार संतोष महाडेश्वर यांनी दिली आहे. या धुळीमुळे इतर छोटी वाहने या रस्त्यावरून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी खुला करू नये, अशी मागणी आता होत आहे.

लोकनगरी ते स्वामी समर्थ चौक या रस्त्याचे सध्या मजबुतीकरण केले आहे. याच रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. मात्र, शिवाजी चौक ते वडवली या रस्त्याचे काम सुरू असल्याने जड वाहतूक या कच्च्या रस्त्यावरून सुरू केली आहे. त्याचा फटका आता स्थानिकांना बसत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना किमान त्या ठिकाणी धूळ उडणार नाही, अशी व्यवस्था करण्याची गरज होती. 

टॅग्स :thaneठाणे