शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीरा रोड भेटीमुळे लहान मुलं, वृध्द आदींना करावी लागली पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 14:56 IST

मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर दोन वेळा साफसफाई केली जात असताना अंतर्गत मार्गावर मात्र कच-याच्या ढिगा-यातुन नागरीकांना मार्ग काढावा लागत होता.

मीरारोड - ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भार्इंदर मध्ये जेमतेम १५ मिनीटांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी आले असता त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील उभी केलेली वाहनं, फेरीवाले, मंडप आदी हटवण्यात आले होते. दोन वेळा रस्त्यांची सफाई करण्यात आली. पण रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहतुक सुमारे ४ तास बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरीकांना लहान मुलं, वृध्द आदींना घेऊन पायपीट करावी लागली. सणासुदीत हाल झाल्याने नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत होता. तर मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर दोन वेळा साफसफाई केली जात असताना अंतर्गत मार्गावर मात्र कच-याच्या ढिगा-यातुन नागरीकांना मार्ग काढावा लागत होता.भार्इंदर रेल्वे स्थानका जवळील पुर्व पश्चिम जोडणा-या शहिद भगतसिंह भुयारी मार्ग व मीरारोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे उदघाटन यासाठी मुख्यमंत्री हे भार्इंदर येथे सायंकाळी ६ वा. तर मीरारोड येथे ७ वा. येणार होते. परंतु भार्इंदर येथेच मुख्यमंत्री तब्बल दोन तास उशीराने म्हणजे सव्वा आठच्या सुमारास आले. जेमतेम १० मीनीटात उद्घाटन करुन ते भुयारी मार्गा तुनच भार्इंदर पुर्वे वरुन मीरारोड स्थानक येथे गेले. तेथे देखील ते जेमतेम ५ मीनीटंच थांबले.पण मुख्यमंत्र्यांच्या या १५ मिनीटांच्या दोन उद्घाटन कार्यक्रमांसाठी नागरीकांना मात्र फारच मनस्ताप सहन करावा लागला. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक येथुन येणारे जाणरे प्रवाशी हे अगदी भार्इंदर पश्चिम, मॅक्सस मॉल, मुर्धा ते थेट उत्तन - चौक व गोराई पर्यंतचे असतात. रेल्वे स्थानका बाहेरुन बस, रीक्षा या शिवाय लोकांना दुचरा पर्याय नसतो.पण मुख्यमंत्री येणार म्हणुन पोलीसांनी सुमारे ४ वाजल्या पासुनच एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या बसच बंद करुन टाकल्या. शिवाय रिक्षा देखील बंद केल्या. सुट्टी दिवस व सणासुदी निमीत्त बाहेर पडलेल्या वृध्द, महिला, मुलं आदींसह नागरीकांना ये - जाण्यासाठी वाहनच नसल्याने अक्षरश: पायपीट करावी लागली. वृध्द, अपंग, महिला व मुलांचे तर खुपच हाल झाले.भार्इंदर पुर्व व मीरारोड भागात देखील परिस्थती वेगळी नव्हती. ऐन सणासुदीच्या दिवसात नाहक पायपीट करावी लागल्याने नागरीकां मधुन संताप व्यक्त होत होता.मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार त्या मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी गाड्यांना हटवण्याचे आवाहन पोलीसांनी सकाळ पासुनच चालवले होते. काही ठिकाणी वाहनं हटवण्यात देखील आली. शिवाय फेरीवाले, हातगाडीवाले आदींना मज्जाव करण्यात आला होता. काही ठिकाणी तर दिवाळी निमीत्त महापालिकेच दुकाना बाहेर मंडप टाकण्याची परवानगी दिलेली असताना मंडप काढण्याचा प्रकार झाला. रीक्षा चालकांसह अनेक व्यावसायीक, परिवहन उपक्रम आदींना देखील आर्थिक नुकसान सोसावे लागले.मुख्यमंत्री ज्या मार्गा वरुन जाणार त्या मार्गावर सकाळी नेहमी प्रमाणे साफसफाई करण्यात आली होतीच. पण दुपार नंतर पुन्हा एकदा रस्ते चकाचक करण्यात आले. त्यासाठी सफाई कामगारांना सुट्टी न देता थांबवण्यात आले होते. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर झाडलोट जोरात करुन रस्ते चकाचक केली जात असताना अंतर्गत रस्त्यावर मात्र कचरयाचे ढिग पडलेले होते. ओला व सुका कचरा वेगळा केला नाही म्हणुन पालिकेने कचरा उचलणे बंद केल्याने रस्त्यावरच पडलेल्या कचरयाच्या ढिगातुन नागरीक वाट काढत असताना दिसत होते.

टॅग्स :thaneठाणे