शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीरा रोड भेटीमुळे लहान मुलं, वृध्द आदींना करावी लागली पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 14:56 IST

मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर दोन वेळा साफसफाई केली जात असताना अंतर्गत मार्गावर मात्र कच-याच्या ढिगा-यातुन नागरीकांना मार्ग काढावा लागत होता.

मीरारोड - ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भार्इंदर मध्ये जेमतेम १५ मिनीटांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी आले असता त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील उभी केलेली वाहनं, फेरीवाले, मंडप आदी हटवण्यात आले होते. दोन वेळा रस्त्यांची सफाई करण्यात आली. पण रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहतुक सुमारे ४ तास बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरीकांना लहान मुलं, वृध्द आदींना घेऊन पायपीट करावी लागली. सणासुदीत हाल झाल्याने नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत होता. तर मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर दोन वेळा साफसफाई केली जात असताना अंतर्गत मार्गावर मात्र कच-याच्या ढिगा-यातुन नागरीकांना मार्ग काढावा लागत होता.भार्इंदर रेल्वे स्थानका जवळील पुर्व पश्चिम जोडणा-या शहिद भगतसिंह भुयारी मार्ग व मीरारोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे उदघाटन यासाठी मुख्यमंत्री हे भार्इंदर येथे सायंकाळी ६ वा. तर मीरारोड येथे ७ वा. येणार होते. परंतु भार्इंदर येथेच मुख्यमंत्री तब्बल दोन तास उशीराने म्हणजे सव्वा आठच्या सुमारास आले. जेमतेम १० मीनीटात उद्घाटन करुन ते भुयारी मार्गा तुनच भार्इंदर पुर्वे वरुन मीरारोड स्थानक येथे गेले. तेथे देखील ते जेमतेम ५ मीनीटंच थांबले.पण मुख्यमंत्र्यांच्या या १५ मिनीटांच्या दोन उद्घाटन कार्यक्रमांसाठी नागरीकांना मात्र फारच मनस्ताप सहन करावा लागला. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक येथुन येणारे जाणरे प्रवाशी हे अगदी भार्इंदर पश्चिम, मॅक्सस मॉल, मुर्धा ते थेट उत्तन - चौक व गोराई पर्यंतचे असतात. रेल्वे स्थानका बाहेरुन बस, रीक्षा या शिवाय लोकांना दुचरा पर्याय नसतो.पण मुख्यमंत्री येणार म्हणुन पोलीसांनी सुमारे ४ वाजल्या पासुनच एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या बसच बंद करुन टाकल्या. शिवाय रिक्षा देखील बंद केल्या. सुट्टी दिवस व सणासुदी निमीत्त बाहेर पडलेल्या वृध्द, महिला, मुलं आदींसह नागरीकांना ये - जाण्यासाठी वाहनच नसल्याने अक्षरश: पायपीट करावी लागली. वृध्द, अपंग, महिला व मुलांचे तर खुपच हाल झाले.भार्इंदर पुर्व व मीरारोड भागात देखील परिस्थती वेगळी नव्हती. ऐन सणासुदीच्या दिवसात नाहक पायपीट करावी लागल्याने नागरीकां मधुन संताप व्यक्त होत होता.मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार त्या मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी गाड्यांना हटवण्याचे आवाहन पोलीसांनी सकाळ पासुनच चालवले होते. काही ठिकाणी वाहनं हटवण्यात देखील आली. शिवाय फेरीवाले, हातगाडीवाले आदींना मज्जाव करण्यात आला होता. काही ठिकाणी तर दिवाळी निमीत्त महापालिकेच दुकाना बाहेर मंडप टाकण्याची परवानगी दिलेली असताना मंडप काढण्याचा प्रकार झाला. रीक्षा चालकांसह अनेक व्यावसायीक, परिवहन उपक्रम आदींना देखील आर्थिक नुकसान सोसावे लागले.मुख्यमंत्री ज्या मार्गा वरुन जाणार त्या मार्गावर सकाळी नेहमी प्रमाणे साफसफाई करण्यात आली होतीच. पण दुपार नंतर पुन्हा एकदा रस्ते चकाचक करण्यात आले. त्यासाठी सफाई कामगारांना सुट्टी न देता थांबवण्यात आले होते. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर झाडलोट जोरात करुन रस्ते चकाचक केली जात असताना अंतर्गत रस्त्यावर मात्र कचरयाचे ढिग पडलेले होते. ओला व सुका कचरा वेगळा केला नाही म्हणुन पालिकेने कचरा उचलणे बंद केल्याने रस्त्यावरच पडलेल्या कचरयाच्या ढिगातुन नागरीक वाट काढत असताना दिसत होते.

टॅग्स :thaneठाणे