शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

सोयी-सुविधा नसल्याने धरली गुजरातची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 07:55 IST

कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.  

- वसंत भोईरवाडा : वारंवार मागणी करूनही वाडा तालुक्यातील उद्योगांना सरकारने सोयी-सुविधा न पुरवल्याने अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला असून ते गुजरात, वापी, दीव, दमणला स्थलांतरित झाले आहेत. याचा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला फटका बसला, तसेच स्थानिक कामगारही बेरोजगार झाले आहेत.  

एकेकाळी भरभराटीला आलेल्या वाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला कामगारांच्या समस्यांनी ग्रासले आहे. खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, महागडी वीज या समस्या सुटत नसल्यानेही काही उद्योगांनी वारंवार दाद मागितली; पण त्यावर तोडगा निघाला नाही. उलट गुजरात आणि त्याला लागून असलेल्या परिसरात तुलनेने वीज स्वस्त आहे. रस्तेही चांगले आहेत. कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.  

हजारो कारखाने असूनही साधी अग्निशमन दलाची सोय नाही. एखाद्या कंपनीला आग लागली, तर त्यातील कोट्यवधींची साधनसामग्री जळत असल्याचे पाहण्यावाचून पर्याय उरत नाही. वाडा तालुका हा पालघर, भिवंडी येथील दोन खासदार आणि भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात विभागलेला आहे. त्यामुळे कोणत्याही एका लोकप्रतिनिधीचे या तालुक्याकडे लक्ष नाही. त्याचा फटका येथील विकासकामांना बसतो. 

तालुक्याच्या दुर्गम भागात अजूनही रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचू शकलेले नाही. कोणत्याही निवडणुकांच्या काळात तोंड भरून आश्वासने दिली जातात. मात्र, नंतर काहीच पदरी पडत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पूर्वी हा मतदारसंघ डहाणू होता. आताच्या पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने ३० वर्षे, भाजपने पंधरा वर्षे, तर शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, या तिन्ही पक्षांना ठोस विकास करता आलेला नाही.

सिंचनाची समस्या,  कारखानेही नाहीतवाडा तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. भाताच्या एकमेव पिकावरच अवलंबून राहावे लागते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे भाजीपाला, कडधान्य, फुलशेती करतात. तानसा, वैतरणा, पिंजर, गारगाई, देहर्जे  या ५ बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर म्हणावे तेवढे बंधारे नसल्याने सिंचनाची समस्या कायम आहे.शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना न आल्याने वेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे बाजारपेठे शोधण्याचे आव्हानही उभे ठाकते.

टॅग्स :palgharपालघर