शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोयी-सुविधा नसल्याने धरली गुजरातची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 07:55 IST

कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.  

- वसंत भोईरवाडा : वारंवार मागणी करूनही वाडा तालुक्यातील उद्योगांना सरकारने सोयी-सुविधा न पुरवल्याने अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला असून ते गुजरात, वापी, दीव, दमणला स्थलांतरित झाले आहेत. याचा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला फटका बसला, तसेच स्थानिक कामगारही बेरोजगार झाले आहेत.  

एकेकाळी भरभराटीला आलेल्या वाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला कामगारांच्या समस्यांनी ग्रासले आहे. खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, महागडी वीज या समस्या सुटत नसल्यानेही काही उद्योगांनी वारंवार दाद मागितली; पण त्यावर तोडगा निघाला नाही. उलट गुजरात आणि त्याला लागून असलेल्या परिसरात तुलनेने वीज स्वस्त आहे. रस्तेही चांगले आहेत. कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.  

हजारो कारखाने असूनही साधी अग्निशमन दलाची सोय नाही. एखाद्या कंपनीला आग लागली, तर त्यातील कोट्यवधींची साधनसामग्री जळत असल्याचे पाहण्यावाचून पर्याय उरत नाही. वाडा तालुका हा पालघर, भिवंडी येथील दोन खासदार आणि भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात विभागलेला आहे. त्यामुळे कोणत्याही एका लोकप्रतिनिधीचे या तालुक्याकडे लक्ष नाही. त्याचा फटका येथील विकासकामांना बसतो. 

तालुक्याच्या दुर्गम भागात अजूनही रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचू शकलेले नाही. कोणत्याही निवडणुकांच्या काळात तोंड भरून आश्वासने दिली जातात. मात्र, नंतर काहीच पदरी पडत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पूर्वी हा मतदारसंघ डहाणू होता. आताच्या पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने ३० वर्षे, भाजपने पंधरा वर्षे, तर शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, या तिन्ही पक्षांना ठोस विकास करता आलेला नाही.

सिंचनाची समस्या,  कारखानेही नाहीतवाडा तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. भाताच्या एकमेव पिकावरच अवलंबून राहावे लागते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे भाजीपाला, कडधान्य, फुलशेती करतात. तानसा, वैतरणा, पिंजर, गारगाई, देहर्जे  या ५ बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर म्हणावे तेवढे बंधारे नसल्याने सिंचनाची समस्या कायम आहे.शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना न आल्याने वेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे बाजारपेठे शोधण्याचे आव्हानही उभे ठाकते.

टॅग्स :palgharपालघर