शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2024 06:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईहून नाशिकला किंवा नाशिकहून मुंबईला येताना दररोज हजारो अवजड वाहने मोटारी, रिक्षा, स्कूटर या छोट्या प्रवासी वाहनांची कोंडी करतात. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोडबंदर रोडवरील मैदानात सभा असल्याने तब्बल तीन हजार अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गासह घाेडबंदर राेडवर थांबवून ठेवल्याने या अवजड वाहनांना वाकुल्या दाखवत माेटार, दुचाकीवरून नागरिकांनी सुसाट व सुखद प्रवासाचा अनुभव घेतला. 

पंतप्रधानांच्या सभेसाठी  ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आधीच दिली हाेती. ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग, तर एक राज्य महामार्गावरील  अवजड वाहने शुक्रवारी रात्रीपासून ठिकठिकाणी थांबवून ठेवली. गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसेच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई, जेएनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक करणारी ही वाहने शहापूर, पडघा परिसरात महामार्गावरील माेकळ्या ठिकाणी थांबवून ठेवली हाेती. मुंब्रा बायपास आणि सरावली दरम्यान ही  अवजड मालवाहू वाहने थांबवण्यात आली हाेती. घाेडबंदर राेडवरील वाहने वसई परिसरातील चिंचाेटी, कामनजवळ अडवण्यात आली हाेती. ठाणे शहराजवळील फाऊंटन हाॅटेलजवळ वाहने थांबवून ठेवली हाेती. 

पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतरही शनिवारी रात्री १२ नंतर ही रोखलेली तीन हजार वाहने संध्याकाळी ७.३० नंतर ही अडकवून ठेवलेली वाहने साेडण्यात आली. त्यामुळे रात्री नऊ नंतर वाहतूककोंडी झाली. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई, ठाण्याच्या दौऱ्यामुळे ठाणे व मुंबईत जाणाऱ्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी या वाहतूक बदलामुळे शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते शिरसाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या वाहतूक काेंडीमुळे बाहेरगावी तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. पालघर जिल्ह्यात विविध देवींच्या दर्शनासाठी निघालेल्या पर्यटकांनाही कोंडीचा फटका बसला. मुंबई-ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वर्सोवा पूल ते चिंचोटी या दरम्यान वाहनांच्या रांगा दिसल्या.

नवी मुंबई-ठाणे रस्ता दिवसभर मोकळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यामुळे अवजड वाहनांना बंदी घातल्याने नवी मुंबई ते ठाणेकडे जाणारे रस्ते दिवसभर मोकळे दिसून आले. अनेक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. जेएनपीटी चौक कर्जत मुरबाड शहापूर कसारा-इगतपुरी नाशिककडे जाण्यासाठी मार्गात बदल करण्यात आला होता.  जेएनपीटी चौक कर्जत, मुरबाड, शहापूर, वाडा, मनोर टोल नाका येथून गुजरातमार्गे तसेच जेएनपीटी पुणे एक्स्प्रेसमार्गे चाकण, नगर, नाशिक हायवेमार्गे इच्छित स्थळी जाण्यास वाहनांना मुभा देण्यात आली होती.

सभेवेळी १४५ जणांना त्रास

ठाण्यात शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी काही महिला आणि पुरुषांना रक्तदाब कमी होणे अथवा वाढणे आणि चक्कर येणे असा त्रास झाला. आरोग्य यंत्रणेमार्फत १४५ जणांवर तत्काळ उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडले. घोडबंदर भागातील बोरीवडे येथे मोदींच्या कार्यक्रमासाठी दोन हजार वाहनांमधून सुमारे एक लाख नागरिक आले होते. येणाऱ्यांना जेवणाचे पाकीट, पाणी देण्यात आले. येथे मोठा तंबू बांधला होता. त्यात हवा खेळती राहील, याची व्यवस्था होती. तरी काहींना त्रास झाला. त्यांना  ओआरएसमिश्रित पाणी दिल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीTrafficवाहतूक कोंडी