शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांच्या पदरी उपेक्षाच; कुरघोडीच्या राजकारणात अडकला १८३ कोटींचा कळवा पुल

By रणजीत इंगळे | Updated: August 27, 2022 18:23 IST

कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोडीने लोक हैराण झाले आहेत. त्यात हा पुल खुला होत नसल्याने जुन्या पुलावर ताण येत असून वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत आहे.

रणजीत इंगळे 

ठाणे - ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणी रस्त्यावरील खड्ड्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. कळवा पुलावर प्रचंड वाहतूककोंडी होत असते या वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात कळव्याच्या नवीन पुलासाठी  १० कोटींची तरतुद केली होती. त्यानंतर आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला गेला आहे. आता या पुलाच्या एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. मुख्यमंत्र्याच्या शहरात असणारा या पुलाचे काम पूर्ण होऊनदेखील पुल बंद असल्याने मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होतय का अशी चर्चा ठाणेकरांत रंगली आहे. 

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करत २५ ऑगस्ट र्पयत येथील एका मार्गीकेचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर हि मार्गिका सुरु केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पुल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुना पुलाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणो - बेलापुर दिशेला असा दोनही मार्गाने हा पुल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पुल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणो स्टेशनकडे खाली उतरणार आहे. केबल स्टेड टाईपचा हा पुल असून तो दिड किमीचा असणार आहे. दरम्यान कोरोनामुळे या पुलाच्या कामाचा वेग मंदावला होता. डिसेंबरमध्ये या पुलाच्या एक लेन खुली केली जाईल असा दावा देखील करण्यात आला होता. परंतु तो दावा देखील फोल ठरल्याचे दिसून आले.

कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोडीने लोक हैराण झाले आहेत. त्यात हा पुल खुला होत नसल्याने जुन्या पुलावर ताण येत असून वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत आहे. त्यामुळे या  खाडी पुलाची एक लेन तरी सुरु करण्यात यावी अशी मागणी लोकमतशी बोलताना माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत त्यामुळे संयम राखला आहे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यांनी लवकर तोडगा काढावा, गणेशउत्सव जवळ आलेत वाहतूककोंडी होते त्यामुले लवकरात लवकरात हा पुल खुला करण्याची मागणी केलीय. तर दुसरकिडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हा पुल लवकरात लवकर सुरु केला जाईल असे लोकमतशी बोलताना सांगितले. राजकीय कुरघोडीमुळे या पुलाच उदघाटन थांबलं आहे का अशी चर्चा ठाणेकरमध्ये रंगली आहे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीEknath Shindeएकनाथ शिंदे