शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

ठाणेकरांच्या पदरी उपेक्षाच; कुरघोडीच्या राजकारणात अडकला १८३ कोटींचा कळवा पुल

By रणजीत इंगळे | Updated: August 27, 2022 18:23 IST

कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोडीने लोक हैराण झाले आहेत. त्यात हा पुल खुला होत नसल्याने जुन्या पुलावर ताण येत असून वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत आहे.

रणजीत इंगळे 

ठाणे - ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणी रस्त्यावरील खड्ड्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. कळवा पुलावर प्रचंड वाहतूककोंडी होत असते या वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात कळव्याच्या नवीन पुलासाठी  १० कोटींची तरतुद केली होती. त्यानंतर आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला गेला आहे. आता या पुलाच्या एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. मुख्यमंत्र्याच्या शहरात असणारा या पुलाचे काम पूर्ण होऊनदेखील पुल बंद असल्याने मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होतय का अशी चर्चा ठाणेकरांत रंगली आहे. 

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करत २५ ऑगस्ट र्पयत येथील एका मार्गीकेचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर हि मार्गिका सुरु केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पुल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुना पुलाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणो - बेलापुर दिशेला असा दोनही मार्गाने हा पुल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पुल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणो स्टेशनकडे खाली उतरणार आहे. केबल स्टेड टाईपचा हा पुल असून तो दिड किमीचा असणार आहे. दरम्यान कोरोनामुळे या पुलाच्या कामाचा वेग मंदावला होता. डिसेंबरमध्ये या पुलाच्या एक लेन खुली केली जाईल असा दावा देखील करण्यात आला होता. परंतु तो दावा देखील फोल ठरल्याचे दिसून आले.

कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोडीने लोक हैराण झाले आहेत. त्यात हा पुल खुला होत नसल्याने जुन्या पुलावर ताण येत असून वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत आहे. त्यामुळे या  खाडी पुलाची एक लेन तरी सुरु करण्यात यावी अशी मागणी लोकमतशी बोलताना माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत त्यामुळे संयम राखला आहे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यांनी लवकर तोडगा काढावा, गणेशउत्सव जवळ आलेत वाहतूककोंडी होते त्यामुले लवकरात लवकरात हा पुल खुला करण्याची मागणी केलीय. तर दुसरकिडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हा पुल लवकरात लवकर सुरु केला जाईल असे लोकमतशी बोलताना सांगितले. राजकीय कुरघोडीमुळे या पुलाच उदघाटन थांबलं आहे का अशी चर्चा ठाणेकरमध्ये रंगली आहे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीEknath Shindeएकनाथ शिंदे