शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशासनाच्या उदासिनतेमुळे स्वखर्चाने शहापूरच्या खंडवीचीवाडीची लघू नळपाणी पुरवठा योजना

By सुरेश लोखंडे | Updated: February 20, 2024 15:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या लघू नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण सोहळा शहापूर,मुरबाड व वाडा येथील प्रगत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जल्लाेषात पार पडला.

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागामधील टाकीपठार जवळील आपटे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील खंडवीचीवाडी या १५० लोकसंख्येच्या आदिवासी लाेकवस्तीच्या पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, ग्राम पंचायत आदी प्रशासनाकडे वेळाेवेळी पाठपुरावा केला. पण या प्रशासनाच्या उदासिनतेला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी स्वखर्चाने लघू नळपाणी योजना सुरू करून या गांवकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली. त्यामुळे येथील जाणकार नागरिक, ग्रामस्थ आणि गृहिणींनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या यशस्वी नळ पाणी पुरवठा याेजने आधी हरणे यांनी जवळच्या ३७८ लाेकवस्तीच्या शेणवे गावातील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून तत्काळ त्या स्मशानभूमीवर पत्र्यांचा शेड उभारून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या लघू नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण सोहळा शहापूर,मुरबाड व वाडा येथील प्रगत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जल्लाेषात पार पडला. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केल्याने श्रीक्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथजी महाराज यांनी हरणे यांचे कौतुक करुन शुभाशीर्वाद दिले. या याेजनेच्या लाेकार्पण साेहळ्याला जेष्ठ गणपत खंडवी, सोमा खंडवी, योगिता खंडवी, शरद शिद, योगेश खंडवी, दौलत खंडवी, मधुकर हरणे, आत्माराम मिरकुटे, पांडुरंग पाटेकर, विलास धानके, विनोद पाटील, किशोर चौधरी, चंद्रकांत मते, विश्वनाथ धुमाळ, सचिन पाटील, विश्वनाथ जाधव, रमेश हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे