शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:34 IST

जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही. पाणीचोरीच्या या गोरखधंद्यामुळेच नागरिकांवर प्रत्येक आठवड्याला पाणीकपातीचा प्रसंग ओढवल्याचे उघड झाले आहे.काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तरीही पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणासह आंध्रा धरणातून होणाºया पाणीपुरवठ्यात सुमारे सात टक्के म्हणजे ५४ दशलक्ष घनमीटर पाण्याची वार्षिक तूट उघडकीस आली. ती भरून काढण्यासाठी जानेवारीपासूनच १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली. मात्र, तरीही पाण्याची चोरी सुरूच राहिली. यामुळे ही कपात वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९ मार्चपासून ही कपात लागू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी महापालिका आता सोयीनुसार करणार आहेत. जादा पाणी उचलण्यातील मनमानी, पाण्याची चोरी याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी बातम्या दिल्या होत्या. पण त्यावर अंकुश न ठेवल्याचे परिणाम लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.पालिकांसह पाणी उचलणाºया संस्थांनी मंजूर कोट्यानुसार पाणी उचलल्यास पाणीकपातीची गरज भासणार नाही. परंतु प्रत्येक पालिकेत ३५ ते ४० टक्के पाणीगळती, चोरी असून ती रोखली जात नाही. काही पालिकांत तर ग्ही गळती-चोरी मोजण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे पालिका गरजेपेक्षा जास्त पाणी उचलतात. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने सध्या महिन्यातून दोन दिवस कपात होती. ती वाढवून चार दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरानंतर पाणीसाठ्याचा आढावा ही कपात कायम ठेवायची की नाही, ते ठरवले जाईल, असे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी सांगितले.उल्हास नदी व बारवी धरणातून ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आदी शहरांना पाणीपुरवठा होतो. यंदा त्यांची पाणीटंचाईतून मुक्तता होईल, असे वाटेत होते. पण, प्रत्येक यंत्रणेने जादा पाणी उचलल्याने चोरी होत असल्याचे जानेवारीतील सर्वेक्षणातून निदर्शनात आले. जनसेवेसाठी पाणीचोरी करत असल्याचे सांगून महापालिका त्यांच्या मनमानीवर पडदा टाकत आहेत. त्याचे परिणाम नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. त्यांना चार दिवस त्याची झळ सोसावी लागेल.- मंजूर पाणीकोट्यापेक्षा कधीकाळी पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलण्यास हरकत नाही. पण, या सवलतीचा गैरफायदा सक्तीच्या कालावधीतही सुरूच ठेवल्यामुळे पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. लघुपाटबंधारे विभागाच्या याआधीच्या अहवालानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका त्यांच्या मंजूर पाणीकोट्यापेक्षा ३० टक्के जादा पाणी उचलत आहे.तर, एमआयडीसीही सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के जादा पाण्याची चोरी-उचल करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रमाणेच टेमघर, एमजेपी, आदी संस्था सुमारे पाच-दहा टक्के जादा पाणी उचलत असल्याची निरीक्षण लघुपाटबंधारे विभागाने नोंदवलेले आहे.कल्याण-डोंबिवली २३४ दशलक्ष लीटर (एमएलडी) मंजूर पाणीपुरवठ्याऐवजी दिवसाला ३१० एमएलडी म्हणजे ३० टक्के जादा पाणी रोज उचलत आहे. याप्रमाणेच एमआयडीसीदेखील ५८३ एमएलडीऐवजी रोज सर्वाधिक ७८० एमएलडी पाण्याची चोरी करत असल्याचे चौकशीअंती उघड झाले.ठाण्याच्या काही भागांसह भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणाºया टेमघरला रोज २८५ एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. पण, तेही ३०० एमएलडी म्हणजे सरासरी १० टक्के जादा पाणीउचलत आहेत. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना पाणीपुरवठा करणारी एमजेपी ९० एमएलडीऐवजी १०० एमएलडी म्हणजे १० टक्के जादा पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Waterपाणी