शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:34 IST

जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही. पाणीचोरीच्या या गोरखधंद्यामुळेच नागरिकांवर प्रत्येक आठवड्याला पाणीकपातीचा प्रसंग ओढवल्याचे उघड झाले आहे.काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तरीही पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणासह आंध्रा धरणातून होणाºया पाणीपुरवठ्यात सुमारे सात टक्के म्हणजे ५४ दशलक्ष घनमीटर पाण्याची वार्षिक तूट उघडकीस आली. ती भरून काढण्यासाठी जानेवारीपासूनच १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली. मात्र, तरीही पाण्याची चोरी सुरूच राहिली. यामुळे ही कपात वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९ मार्चपासून ही कपात लागू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी महापालिका आता सोयीनुसार करणार आहेत. जादा पाणी उचलण्यातील मनमानी, पाण्याची चोरी याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी बातम्या दिल्या होत्या. पण त्यावर अंकुश न ठेवल्याचे परिणाम लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.पालिकांसह पाणी उचलणाºया संस्थांनी मंजूर कोट्यानुसार पाणी उचलल्यास पाणीकपातीची गरज भासणार नाही. परंतु प्रत्येक पालिकेत ३५ ते ४० टक्के पाणीगळती, चोरी असून ती रोखली जात नाही. काही पालिकांत तर ग्ही गळती-चोरी मोजण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे पालिका गरजेपेक्षा जास्त पाणी उचलतात. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने सध्या महिन्यातून दोन दिवस कपात होती. ती वाढवून चार दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरानंतर पाणीसाठ्याचा आढावा ही कपात कायम ठेवायची की नाही, ते ठरवले जाईल, असे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी सांगितले.उल्हास नदी व बारवी धरणातून ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आदी शहरांना पाणीपुरवठा होतो. यंदा त्यांची पाणीटंचाईतून मुक्तता होईल, असे वाटेत होते. पण, प्रत्येक यंत्रणेने जादा पाणी उचलल्याने चोरी होत असल्याचे जानेवारीतील सर्वेक्षणातून निदर्शनात आले. जनसेवेसाठी पाणीचोरी करत असल्याचे सांगून महापालिका त्यांच्या मनमानीवर पडदा टाकत आहेत. त्याचे परिणाम नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. त्यांना चार दिवस त्याची झळ सोसावी लागेल.- मंजूर पाणीकोट्यापेक्षा कधीकाळी पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलण्यास हरकत नाही. पण, या सवलतीचा गैरफायदा सक्तीच्या कालावधीतही सुरूच ठेवल्यामुळे पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. लघुपाटबंधारे विभागाच्या याआधीच्या अहवालानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका त्यांच्या मंजूर पाणीकोट्यापेक्षा ३० टक्के जादा पाणी उचलत आहे.तर, एमआयडीसीही सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के जादा पाण्याची चोरी-उचल करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रमाणेच टेमघर, एमजेपी, आदी संस्था सुमारे पाच-दहा टक्के जादा पाणी उचलत असल्याची निरीक्षण लघुपाटबंधारे विभागाने नोंदवलेले आहे.कल्याण-डोंबिवली २३४ दशलक्ष लीटर (एमएलडी) मंजूर पाणीपुरवठ्याऐवजी दिवसाला ३१० एमएलडी म्हणजे ३० टक्के जादा पाणी रोज उचलत आहे. याप्रमाणेच एमआयडीसीदेखील ५८३ एमएलडीऐवजी रोज सर्वाधिक ७८० एमएलडी पाण्याची चोरी करत असल्याचे चौकशीअंती उघड झाले.ठाण्याच्या काही भागांसह भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणाºया टेमघरला रोज २८५ एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. पण, तेही ३०० एमएलडी म्हणजे सरासरी १० टक्के जादा पाणीउचलत आहेत. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना पाणीपुरवठा करणारी एमजेपी ९० एमएलडीऐवजी १०० एमएलडी म्हणजे १० टक्के जादा पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Waterपाणी