शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:34 IST

जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही. पाणीचोरीच्या या गोरखधंद्यामुळेच नागरिकांवर प्रत्येक आठवड्याला पाणीकपातीचा प्रसंग ओढवल्याचे उघड झाले आहे.काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तरीही पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणासह आंध्रा धरणातून होणाºया पाणीपुरवठ्यात सुमारे सात टक्के म्हणजे ५४ दशलक्ष घनमीटर पाण्याची वार्षिक तूट उघडकीस आली. ती भरून काढण्यासाठी जानेवारीपासूनच १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली. मात्र, तरीही पाण्याची चोरी सुरूच राहिली. यामुळे ही कपात वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९ मार्चपासून ही कपात लागू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी महापालिका आता सोयीनुसार करणार आहेत. जादा पाणी उचलण्यातील मनमानी, पाण्याची चोरी याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी बातम्या दिल्या होत्या. पण त्यावर अंकुश न ठेवल्याचे परिणाम लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.पालिकांसह पाणी उचलणाºया संस्थांनी मंजूर कोट्यानुसार पाणी उचलल्यास पाणीकपातीची गरज भासणार नाही. परंतु प्रत्येक पालिकेत ३५ ते ४० टक्के पाणीगळती, चोरी असून ती रोखली जात नाही. काही पालिकांत तर ग्ही गळती-चोरी मोजण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे पालिका गरजेपेक्षा जास्त पाणी उचलतात. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने सध्या महिन्यातून दोन दिवस कपात होती. ती वाढवून चार दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरानंतर पाणीसाठ्याचा आढावा ही कपात कायम ठेवायची की नाही, ते ठरवले जाईल, असे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी सांगितले.उल्हास नदी व बारवी धरणातून ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आदी शहरांना पाणीपुरवठा होतो. यंदा त्यांची पाणीटंचाईतून मुक्तता होईल, असे वाटेत होते. पण, प्रत्येक यंत्रणेने जादा पाणी उचलल्याने चोरी होत असल्याचे जानेवारीतील सर्वेक्षणातून निदर्शनात आले. जनसेवेसाठी पाणीचोरी करत असल्याचे सांगून महापालिका त्यांच्या मनमानीवर पडदा टाकत आहेत. त्याचे परिणाम नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. त्यांना चार दिवस त्याची झळ सोसावी लागेल.- मंजूर पाणीकोट्यापेक्षा कधीकाळी पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलण्यास हरकत नाही. पण, या सवलतीचा गैरफायदा सक्तीच्या कालावधीतही सुरूच ठेवल्यामुळे पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. लघुपाटबंधारे विभागाच्या याआधीच्या अहवालानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका त्यांच्या मंजूर पाणीकोट्यापेक्षा ३० टक्के जादा पाणी उचलत आहे.तर, एमआयडीसीही सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के जादा पाण्याची चोरी-उचल करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रमाणेच टेमघर, एमजेपी, आदी संस्था सुमारे पाच-दहा टक्के जादा पाणी उचलत असल्याची निरीक्षण लघुपाटबंधारे विभागाने नोंदवलेले आहे.कल्याण-डोंबिवली २३४ दशलक्ष लीटर (एमएलडी) मंजूर पाणीपुरवठ्याऐवजी दिवसाला ३१० एमएलडी म्हणजे ३० टक्के जादा पाणी रोज उचलत आहे. याप्रमाणेच एमआयडीसीदेखील ५८३ एमएलडीऐवजी रोज सर्वाधिक ७८० एमएलडी पाण्याची चोरी करत असल्याचे चौकशीअंती उघड झाले.ठाण्याच्या काही भागांसह भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणाºया टेमघरला रोज २८५ एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. पण, तेही ३०० एमएलडी म्हणजे सरासरी १० टक्के जादा पाणीउचलत आहेत. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना पाणीपुरवठा करणारी एमजेपी ९० एमएलडीऐवजी १०० एमएलडी म्हणजे १० टक्के जादा पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Waterपाणी