शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सामाजिक दायित्वामुळे १० रुपयांत जेवण शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 23:09 IST

दात्यांनी पुढे येण्याची गरज । अंबरनाथ-बदलापुरातील उपक्रम

पंकज पाटील

बदलापूर / अंबरनाथ : भुकेल्याला अन्न देणे हे पुण्याचे काम मानले जाते. त्यामुळेच अंबरनाथ आणि बदलापुरात वेगवेगळ्या संकल्पनांतून दोन ठिकाणी १० रुपयांत जेवण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात, चांगले जेवण १० रुपयांत देणे हे आर्थिकदृृष्ट्या अवघड असले तरी ही तारेवरची कसरत संयोजकांनी यशस्वीरीत्या सुरू केली आहे.

राज्यात शिवसेनेने १० रुपयांत, तर भाजपने ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याची सवंग घोषणा निवडणुकीपूर्वी केली असली, तरी त्याआधीच अंबरनाथ-बदलापुरात सामाजिक बांधीलकीतून जेवणाच्या दर्जात तडजोड न करता १० रुपयांत जेवण देणे शक्य करून दाखविले आहे. अंबरनाथमध्ये गावदेवी चौकात १० रुपयांत जेवण देण्याची संकल्पना शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी राबवली आहे. दररोज दुपारी ३०० जणांच्या जेवणाची सोय केली जात आहे. ते देत असताना त्याचा दर्जा सांभाळला जात आहे. तो चांगला ठेवण्यासाठी स्वत: वाळेकर आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष देत आहेत.बदलापुरात कॅप्टन आशीष दामले यांनी ताईज् किचन नावाने १० रुपयांत जेवण देण्याचा उपक्रम राबविला. या ठिकाणी दुपारी २५० ते सायंकाळी १५० जणांना जेवण देण्यात येते. दररोज सरासरी ३५० ते ४०० नागरिक या ठिकाणी १० रुपयांत जेवण करतात. मात्र, ते करण्यासाठी दामले यांना एका वर्षाचे नियोजन आधीच करून ठेवावे लागत आहे. जेवणासाठी लागणारा भाजीपाला हा थेट जुन्नरहून मागविण्यात येतो. त्यामुळे भाजी स्वस्त मिळते, तर कडधान्य हे होलसेल मार्केटमधून आधीच भरून ठेवलेले असते. ते खरेदी करत असताना मार्केटमधील व्यापारीही आपला नफा बाजूला ठेवून कडधान्य विकतात. भाजी आणि कडधान्य या दोन वस्तू मदतीच्या स्वरूपात मिळविण्याचा प्रयत्न दामले यांच्यामार्फत सुरू असतो.गॅस, तेल आणि गहू यापैकी दोन वस्तू मदत स्वरूपात मिळाल्यास १० रुपयांत दर्जेदार जेवण देणे शक्य आहे. प्रत्येक वाराची भाजी निश्चित असल्याने त्या प्रमाणात धान्य भरले जाते. त्यात मूग, मटकी, सोयाबिन, शेवभाजी, छोले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. काही व्यक्ती या उपक्रमास स्वत:हून मदत करतात.प्रत्यक्षात एकवेळचे जेवण देताना प्रत्येक ताट हे २० रुपयांच्या घरात जाते. परंतु, ते १० रुपयांत देत असताना त्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत होते. कोणाचा वाढदिवस असेल, तर ती व्यक्ती जेवणाचा सर्व खर्च करते. तसेच काही व्यक्तींची आर्थिक मदत होते, तर काही वस्तूस्वरूपात धान्य देत असल्याने त्याचीदेखील मदत होते.

टॅग्स :thaneठाणेambernath-acअंबरनाथShiv Senaशिवसेना