शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले माहुलीच्या कुशीतील गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:23 IST

शहापूर शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मुंबई - नाशिक महामार्गालगतच्याच इतिहासकालीन किल्ले माहुलीच्या कुशीत असलेल्या पाच महसुली गावे आणि १८ आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मुंबई - नाशिक महामार्गालगतच्याच इतिहासकालीन किल्ले माहुलीच्या कुशीत असलेल्या पाच महसुली गावे आणि १८ आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. विशेष म्हणजे महसुली गावांना ज्या विहिरींवरून पाणी योजना सुरू होती त्या विहिरींचे पाणी देखील आटल्याने ग्रुपग्रामपंचायत आवाळे येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते आहे.ग्रुपग्रामपंचायत आवाळे मध्ये माहुली, चांदरोटी, आवाळे, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांचा समावेश आहे. तसेच जुनवणी, शाळेचा पाडा, ग्रामपंचायत पाडा, आंबेडोह पाडा, वाडूपाडा, टोकरेपाडा, जांभूळपाडा, बेरिसंगी पाडा, सुतार पाडा, खरपडे पाडा, पत्र्याचा पाडा, बोरीचा पाडा आणि इतर असे १८ आदिवासी पाडे आहेत. या ग्रामपंचायतीमधील गाव - पाड्यांची लोकसंख्या तब्बल चार हजार आहे. विशेष म्हणजे या ग्रामस्थांना अजूनही थेट नदीवरील नळपाणी योजनेचा लाभ मिळालेला नाही. गावात असलेल्या विहिरींवरून नळाद्वारे पाणी, तर काही आदिवासी वाड्यांना बोअरवेलद्वारे पाणी सुरू असते. यंदा मात्र एप्रिलअखेरपासूनच पाणी टंचाईचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागतो आहे.किल्ले माहुलीवर बारमाही पाणीमाहुली किल्ल्यावरील भांडार गडावर आजही पाण्याचे तलाव, दगडी मोठ्या पाण्याच्या टाक्या अस्तित्वात आहेत. गडावर पर्यटनासाठी सोयी जरी कमी असल्या तरी पर्यटकांना गडावर गेल्यावर या तलावातील, दगडी पाण्याच्या टाक्यांमधील थंड पाणी बारमाही उपलब्ध असते. पाऊसकाळात याच गडावरून वाहणाऱ्या भारंगी नदीचे पाणी भातसा नदीला जावून मिळते. तेच पाणी अडवण्यासाठी माहुली किल्ल्याच्या खालील बाजूस शासनाने वेगवेगळे बंधारे बांधले आणि परिसरातील माहुली आणि चांदरोटी गावाजवळील जुन्या तलावांचा गाळ काढून ते स्वच्छ केले तर आसपासच्या आदिवासी पाड्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती माहुली निसर्ग सेवा न्यासच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आमच्या ग्रामपंचायतीमार्फत काही खाजगी कंपनी मालकांची मदत घेऊन परिसरात जे शिवकालीन तलाव आहेत, त्यांचे गाळ काढण्याचे काम आम्ही लवकरच हाती घेणार असून सद्यस्थितीत पंचायत समिती प्रशासनाकडे वाढीव टँकरची मागणी केली आहे. - प्रदीप आगीवले, उपसरपंच, ग्रुपग्रामपंचायत आवाळेकिल्ले माहुलीची उंची जास्त असल्याने गडावरील पाणी खाली आणण्यापेक्षा परिसरातील शिवकालीन तलाव तसेच भारंगी नदीवर शहापूरपर्यंत सिमेंट बंधारे बांधले गेले तर माहुली परिसरासोबतच शहापूरचा पाणी प्रश्नही निकालात निघू शकतो. यासाठी आमची संस्था नेहमीच प्रशासनास सहकार्य करेल. - अ‍ॅड. अमेय आठवले, माहुली निसर्ग सेवा न्यास संस्था, शहापूरमाहुली जवळील भाग उंचावर आहे आणि पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याचा स्रोत उपलब्ध होत नाही. सध्या तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने दिवसाड पाणी पुरवठा केला जात आहे. पुढे ठोस उपाययोजनांचे प्रस्ताव पाठवण्यात येतील.- विजया पांढरे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती, शहापूर

टॅग्स :thaneठाणे