शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दुरूस्तीच्या कामामुळे कंत्राटी कर्मचा-यांची आबाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 17:56 IST

कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.

ठळक मुद्देअत्रे रंगमंदिराच्या डागडुजीचा फटका

कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर नाटयगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्याच्या अनुषंगाने या रंगमंदिराचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतू आजवर कामाला सुरूवात झालेली नाही. दुरूस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पार पडून देखील आतापर्यंत कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यात कार्यादेश मिळाल्याशिवाय कामाला प्रारंभ नाही अशी भुमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेणे देखील आवश्यक असून ही प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. त्यामुळे दुरू स्तीचे काम सुरू होण्यास अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नाटकाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी पडद्यावरील कलाकारांइतकीच पडद्यामागील कुशल कर्मचा-यांचीही तितकीच महत्वाची भुमिका असते. परंतू अत्रे रंगमंदिर दुरूस्तीसाठी बंद ठेवले गेल्याने तेव्हापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून येथील सात कर्मचा-यांवर कामाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. हे लाईट, वातानुकुलीत यंत्र, जनरेटर व साऊंड अशी विविध जबाबदारी सांभाळणारे हे सात कर्मचारी अत्रे रंगमीदर ज्यावेळेस उभारण्यात आले तेव्हापासून याठिकाणी काम करीत आहेत. याठिकाणचा कामाचा पसारा पाहता आणखीन कर्मचा-यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतू केडीएमसीने केवळ सातच कर्मचारी तेही कंत्राटी पध्दतीने नेमले आहेत. विशेष बाब म्हणजे गेली अनेकवर्षे काम करणा-या या कर्मचा-यांना कायमस्वरूपी महापालिका सेवेत सामावून घ्या असा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला आहे. पण त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांनी तर या कर्मचा-यांना भेडसावणा-या गैरसोयींचा पाढा तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे कथन करून संबंधित कर्मचा-यांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली होती. सेवेत कायम करण्यास प्रशासनाला मुहूर्त गावला नसताना आता तर गेले वर्षभर नाटयगृह बंद राहील्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांची वयही तिशीच्या वर उलटल्याने अन्य कोठे नोकरी मिळू शकत नाही. परिणामी वर्षभर आबाळ सुरू असल्याची व्यथा त्यांनी लोकमतकडे मांडली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली