शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

‘त्या’ दुरूस्तीच्या कामामुळे कंत्राटी कर्मचा-यांची आबाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 17:56 IST

कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.

ठळक मुद्देअत्रे रंगमंदिराच्या डागडुजीचा फटका

कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर नाटयगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्याच्या अनुषंगाने या रंगमंदिराचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतू आजवर कामाला सुरूवात झालेली नाही. दुरूस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पार पडून देखील आतापर्यंत कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यात कार्यादेश मिळाल्याशिवाय कामाला प्रारंभ नाही अशी भुमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेणे देखील आवश्यक असून ही प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. त्यामुळे दुरू स्तीचे काम सुरू होण्यास अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नाटकाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी पडद्यावरील कलाकारांइतकीच पडद्यामागील कुशल कर्मचा-यांचीही तितकीच महत्वाची भुमिका असते. परंतू अत्रे रंगमंदिर दुरूस्तीसाठी बंद ठेवले गेल्याने तेव्हापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून येथील सात कर्मचा-यांवर कामाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. हे लाईट, वातानुकुलीत यंत्र, जनरेटर व साऊंड अशी विविध जबाबदारी सांभाळणारे हे सात कर्मचारी अत्रे रंगमीदर ज्यावेळेस उभारण्यात आले तेव्हापासून याठिकाणी काम करीत आहेत. याठिकाणचा कामाचा पसारा पाहता आणखीन कर्मचा-यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतू केडीएमसीने केवळ सातच कर्मचारी तेही कंत्राटी पध्दतीने नेमले आहेत. विशेष बाब म्हणजे गेली अनेकवर्षे काम करणा-या या कर्मचा-यांना कायमस्वरूपी महापालिका सेवेत सामावून घ्या असा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला आहे. पण त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांनी तर या कर्मचा-यांना भेडसावणा-या गैरसोयींचा पाढा तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे कथन करून संबंधित कर्मचा-यांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली होती. सेवेत कायम करण्यास प्रशासनाला मुहूर्त गावला नसताना आता तर गेले वर्षभर नाटयगृह बंद राहील्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांची वयही तिशीच्या वर उलटल्याने अन्य कोठे नोकरी मिळू शकत नाही. परिणामी वर्षभर आबाळ सुरू असल्याची व्यथा त्यांनी लोकमतकडे मांडली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली