शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रमजानमुळे दुधाच्या दराला उकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 06:44 IST

मंगळवारी कल्याणच्या दूधनाक्यावरील दर ६५, तर भिवंडीत ६४ रूपयांवर पोहोचले.

कल्याण : रमजाननिमित्ताने तयार होणारे पदार्थ आणि उपवास सुरू करण्यापूर्वी किंवा सोडताना वाढलेल्या मागणीमुळे कल्याण, भिवंडीत गोठ्यातून वितरित होणाऱ्या दुधाच्या दरात गेल्या आठवडाभरात सतत वाढ होत गेली आहे. भिवंडीत तर अवघ्या दोन दिवसांत दर दहा रूपयांनी कडाडले आहेत. त्यामुळे मंगळवारी कल्याणच्या दूधनाक्यावरील दर ६५, तर भिवंडीत ६४ रूपयांवर पोहोचले.यंदा रमजान महिना उन्हाळ््यात आल्याने लस्सी, ताक, फिरनीसाठी (तांदळाच्या खिरीचा एक प्रकार) दुधाची मागणी वाढली आहे. मिठाईसाठीही दुधाचा वापर होतो. पण उन्हाळा प्रचंड असल्याने सध्या मिठाईसाठी दुधाची मागणी फार वाढलेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रमजान ईदची तयारी सुरू झाली की मिठाईसाठीच्या दुधाची मागणी वाढत जाईल, असे दूधविक्रेत्यांचे म्हणणे आहे.सध्या दर वाढत गेल्याने गोठ्यातील दुधाचा आग्रह धरणाºया ग्राहकांची ससेहोलपट सुरू आहे. सर्वसाधारणत: चाºयाचे प्रमाण घटल्याने आणि उन्हामुळेही या काळात दुधाच्या प्रमाणात घट होते. परिणामी, दर चढेच असतात. त्यात यंदा रमजानची भर पडल्याने हे दर आणखी कडाडले आहेत. ईद जवळ आली, की नेहमीच दुधाचे दर आणखी वाढतात. तसे ते पुढच्या महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.भिवंडीत सेहरीच्यावेळी तुर्रीसाठी वाढतेय मागणीभिवंडी : लोकसंख्येच्या ६० टक्के मुस्लिमबांधव शहरात राहत असून प्रत्येक कुटुंबात महिनाभर रोजा (उपवास) ठेवतात. रोजाच्या काळात प्रत्येक कुटुंबात उपवास सोडताना दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. अनेक कुटुंबांत सेहरीसाठी दुधापासून ‘तुर्री ’बनवतात. परिणामी, दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. रमजानच्या पहिल्या दिवसापासून मागणी वाढल्याने दूधविक्रेत्यांनी ५४ रुपये लीटर असलेले दूध १० रुपयांनी वाढवून ६४ रुपये केले. त्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दुधाची दोन दिवसांत १० रुपयांनी झालेली भाववाढ पाहता रमजान ईदपर्यंत दुधाचे भाव १०० रुपये लीटर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात दूध उत्पादकांची संघटना असून याबाबत तक्रार करूनही दरवाढीकडे दुर्लक्ष केले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ramzanरमजानmilkदूध