शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सवलतीच्या वाहनखरेदीसाठी ठाण्यात तोबा गर्दी

By admin | Updated: April 1, 2017 06:06 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदीविक्रीवर

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदीविक्रीवर उद्या १ एप्रिलपासून बंदी घातल्याने वाहन कंपन्यांनी या वाहनांच्या खरेदीकरिता विशेष सवलत जाहीर केली होती. त्यामुळे ठाण्यातील वेगवेगळ्या शोरूममध्ये वाहनखरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. ठाणेकरांचा खरेदीचा उत्साह इतका दांडगा होता की, शोरूममालकांनी सवलतीच्या दरातील वाहनांचा साठा संपल्याचे सांगितल्याने खरेदीसाठी आलेल्यांची घोर निराशा झाली.कल्याण-डोंबिवलीतही ठाण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनांच्या नोंदणीची वेळ आरटीओने कमी केल्याने शोरूममालकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे पाहण्यास मिळाले. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होते. बीएस-४ हे कमीतकमी वायुप्रदूषण करणारे इंजीन असून तेच न्यायालयाने वाहनांसाठी बंधनकारक केले आहे. त्याचा फटका बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांना बसणार असल्याने वाहन कंपन्यांची झोप उडाली आहे. १ एप्रिलपासून अशा वाहनांची खरेदीविक्र ी होऊ शकणार नसल्याने विविध वाहन कंपन्यांनी दुचाकींवर हजारो रुपयांची, तर चारचाकी वाहनांवर लाखो रुपयांची सवलत जाहीर केली. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील होंडा शोरूममध्ये वाहनखरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकाच गर्दी झाल्याने जणू जत्रेसारखी परिस्थिती उद्भवली. दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाणेकरांनी वाहनखरेदीचा उत्साह दाखवला होता. त्यावेळी मूळ किमतीत ज्यांनी ही वाहने खरेदी केली, त्यांना आजचे सवलतीचे दर ऐकून चुटपुट लागली. एखादा साड्यांचा सेल लागल्यावर जशा उड्या पडतात, तशाच पद्धतीने ठाणेकरांनी शुक्रवारी वाहने खरेदी केल्याने नोटाबंदी, महागाई वगैरे यासारखे विरोधकांकडून बोलले जाणारे मुद्दे किती फिजूल आहेत, याची साक्ष मिळाली. ठाण्यातील होंडाच्या शोरूममधून मागील २ दिवसांत जवळपास ५०० गाड्यांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले, तर कल्याणमधील वाहनांच्या शोरूमालकाने दिवसभरात ७५ वाहनांची विक्री झाल्याचे सांगितले. डोंबिवलीत शोरूमबाहेर बीएस-३ ची वाहने उपलब्ध नसल्याचे फलक लावल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी)दोन दिवसांत १३०० वाहनांची नोंदणीठाणे आरटीओमध्ये आॅनलाइन पद्धतीने १३०० वाहननोंदणी झाली आहे. गुढीपाडव्याला ३४५ वाहनांची नोंदणी झाली होती.यामध्ये सर्वाधिक २६३ दुचाकींचा समावेश होता. २९ मार्चला २८६ वाहने नोंदली गेली. मात्र, बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांना बंदी झाल्याने ३० मार्चला ६७५ वाहनांची नोंदणी झाली.त्यामध्ये ३९४ दुचाकी, तर १०८ चारचाकी वाहनांचा समावेश होता. त्याचप्रमाणे आज (३१मार्चला) रात्री ८ वाजेपर्यंत ५६३ वाहनांची नोंदणी झाली होती. यामध्ये ३३१ दुचाकी, तर १०३ चारचाकी १२९ अवजड वाहनांची नोंदणी झाली असून ही नोंदणी वाढण्याची शक्यता आरटीओने वर्तवली आहे.